Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निरपेक्ष पद्धतीने भक्ती करण्याचा प्रयत्न करा

स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज ः प्रवरासंगम-टोका येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम-टोका येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शुक्रवारी 3 मे रोजी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी

अतिक्रमणात धोंडेवाडी अर्धे गाव उध्वस्त
खा.विखे यांच्या माध्यमातून शहराचा अनुशेष भरून काढू -: माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड
पोलिसाने पोलिसावरच चालवली बंदूक… थोडक्यात टाळला अनर्थ…

नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम-टोका येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शुक्रवारी 3 मे रोजी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने करण्यात आली.भगवंताला प्रिय होण्यासाठी निरपेक्ष पध्दतीने भक्ती करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.
     शुक्रवारी झालेल्या काल्याच्या किर्तन प्रसंगी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी दत्त अवतारी श्री समर्थ सदगुरू किसनगिरीजी बाबा व शांतीब्रम्ह गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांनी समाजाच्या उद्धारासाठी केलेली तपश्‍चर्या, त्याग,समर्पित जीवन कार्य यावेळी बोलताना विषद केले.झालेल्या काल्याच्या किर्तन प्रसंगी स्वामींनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचे वर्णन केले. संत तुकोबारायांच्या घेतलेल्या अभंगातून त्यांनी भगवंतांची भक्तांवर असलेली भक्त वत्सलता कशी असते हे किर्तनातून बोलतांना स्पष्ट केले. देव भक्तांचा भाव पहात असतो त्याला दुसरे काहीही लागत नाही, देवाजवळ जायचे असेल तर जीवनात संत संगतीत राहून परमार्थ करा, देवाला प्रिय होण्यासाठी निरपेक्ष भक्ती करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी झालेल्या काल्याच्या किर्तन प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताहात योगदान देणार्‍यांचा सन्मान श्रीफळ प्रसाद व उपरणे देऊन करण्यात आला यावेळी माजी सरपंच गजानन चव्हाण, ईश्‍वर बाकलीवाल, शंकर जाधव, प्रकाश निकम, राजेंद्र चव्हाण यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी अशोक महाराज पांडव, राजेंद्र महाराज आसने, अशोक महाराज निरपळ, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, माजी सरपंच सुनीलराव बाकलीवाल, संदीप सुडके, पांडुरंग काळे, दिनकर कदम, सुभाष दिघे, गजानन चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाबासाहेब शिंदे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आठ दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहात बीड येथील हभप वर्षाताई काळे,अमोल महाराज बडाख, संतोष महाराज चौधरी, कारभारी महाराज झरेकर, जगदीश महाराज जोशी,जगन्नाथ महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम झाले.तर दुपारी 3 ते 5 यावेळेत रामायणाचार्य हभप अशोक महाराज निरपळ यांच्या सुश्राव्य वाणीतून झालेल्या संगीत रामायण कथेला ही ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

COMMENTS