अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील तिघा तरुणांवर एकाच दिवशी काळाचा घाला

Homeताज्या बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील तिघा तरुणांवर एकाच दिवशी काळाचा घाला

रात्रीच्या अंधारात उसाच्या ट्रॉलीचा अंदाज आला नाही अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी गावात घडली घटना

अहमदनगर प्रतिनिधी - एकाच गावातील तिघा तरुणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नगर जिल्ह्यात घडली. अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी (Kashti) गाव

आठ वर्षीय तनिषला दुचाकीची धडक
कब्बडीचे सामने पाहायला गेलेल्या तरुणांची गाडी उलटली !
कामावरून घरी परतताना अज्ञात वाहनाने उडविले

अहमदनगर प्रतिनिधी – एकाच गावातील तिघा तरुणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नगर जिल्ह्यात घडली. अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी (Kashti) गावात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.काष्टी गावातील बाजारतळ परिसरात ऋषिकेश महादेव मोरे, वय 26, स्वप्निल सतिश मनुचार्य, वय 24 आणि गणेश बापू शिंदे, वय 25 हे तिघे दुचाकीवरुन जात होते. काल रात्री दुचाकीवरुन एकत्र जात असतेवेळी अंधारात उसाच्या ट्रॉलीचा अंदाज आला नाही यामुळे हा अपघात झाला

COMMENTS