मच्छीमारांना कोळीवाड्याकडून आर्थिक साह्य

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मच्छीमारांना कोळीवाड्याकडून आर्थिक साह्य

मुंबईतील माहीम कोळी वाडा व खार दांडा कोळीवाड्यातील तौक्ते वादळातील अपघातग्रस्त मच्छीमारांना कोळी महासंघाच्या वतीने आर्थिक मदत व अन्न धान्य वाटप करून मदतीचा हात दिला.

साताऱ्यातील शिवगर्जना मेळाव्यात खा. संजय राऊतांची मोदी शहांवर टीका 
रत्नदीपच्या डॉ. भास्कर मोरेनी जामीन अर्ज घेतला माघारी
मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली ; रुग्णालयात दाखल

मुंबई/प्रतिनिधी: मुंबईतील माहीम कोळी वाडा व खार दांडा कोळीवाड्यातील तौक्ते वादळातील अपघातग्रस्त मच्छीमारांना कोळी महासंघाच्या वतीने आर्थिक मदत व अन्न धान्य वाटप करून मदतीचा हात दिला. येथील ज्या मच्छीमार बांधवांच्या बोटी नष्ट झालेल्या आहेत, अशा बोट मालकांना कोळी महासंघ व भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार रमेश पाटील तसेच आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते धनादेश वाटप करून आर्थिक सहाय्य केले. 

    या वेळी कोकण किनारपट्टीवर तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत असून राज्यपालांनाही आम्ही याबाबतचे निवेदन देवून मच्छीमार बांधवांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली व मच्छीमार बांधवांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तात्काळ मदत करण्यास सांगितले असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी,  सरचिटणीस राजहंस टपके, भाजपच्या मच्छीमार सेलचे अध्यक्ष अ‍ॅड. चेतन पाटील, माजी नगरसेवक विलास चावरी, चिंतामणी निवटे तसेच कोळी महासंघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण किनारपट्टीवर गेल्या आठवड्यात झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांचे खूप नुकसान झालेले आहे. या चक्रीवादळामुळे मच्छीमार बांधव अडचणीत सापडला आहे. कित्येक मच्छीमारांंची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत; परंतु अशा वेळी सरकारने मच्छीमार बांधवांना मदत करणे गरजेचे असताना अजूनपर्यंत सरकारकडून मच्छीमार बांधवांना कोणतीही ठोस मदत करण्यास आलेली नाही. कित्येक मच्छीमारांच्या बोटीचे, घरांचे नुकसान झालेले आहेत तसेच काही मच्छीमार या चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडले आहेत. अशा मच्छीमारांना कोणतीही मदत करण्यात आलेली नाही. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळीसुद्धा मच्छीमार बांधवांना सरकारने मदत केलेली नसून सरकार मच्छीमारांना फक्त आश्‍वासन देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे, असा आरोप आ. पाटील यांनी केला. कित्येक वर्षापासून राज्यातील मच्छीमारांचा डिझेल परतावा सरकारकडे प्रलंबित आहे. आधीच कोरोनाच्या महामारीमुळे मच्छीमार व्यवसाय संकटात सापडला आहे. ऐन मोसमाच्या काळात झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधव देशोधडीला लागलेला असताना सरकार मच्छीमार बांधवांना कोणतीच मदत करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. कोळी महासंघाने किनारपट्टीवरील तोक्ते चक्री वादळांमुळे झालेल्या नुकसानीची  पाहाणी केली. या वेळी मच्छिमार बांधवांचे नुकसान झाल्याचे आढळून आल्याने या मच्छीमार बांधवांना धनादेश व धान्य वाटप केल्याची माहिती अ‍ॅड.चेतन पाटील यांनी दिली.

COMMENTS