Homeताज्या बातम्यादेश

झारखंडच्या इमारत कोसळून तिघांचा मृत्यू

रांची ः झारखंड राज्यातील देवघर शहरात रविवारी सीता हॉटेलजवळील तीन मजली घर पहाटे पाचच्या सुमारास कोसळले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. चार ज

नांदेड तालुक्यात सोमेश्वर  परिसरात  गारांचा वादळी वार्‍यासह पाऊस
जन्मदात्या आईनेच घेतला पोटच्या मुलांचा जीव
 शिक्षकासह नगरपालिकेच्या कामगाराचा 26 जानेवारीला करणार  सन्मान

रांची ः झारखंड राज्यातील देवघर शहरात रविवारी सीता हॉटेलजवळील तीन मजली घर पहाटे पाचच्या सुमारास कोसळले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्यात गुंतले. 8 तास बचावकार्य सुरू होते. पथकाने तीन मुलांसह 4 जणांची सुखरूप सुटका केली. मात्र मनीष दत्त (50), सुनील यादव (35) आणि सुनील यादव यांची पत्नी सोनी देवी (28) या तिघांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS