Homeताज्या बातम्या

सेल्फीच्या नादात दोन जीवलग मित्रांचा दुर्देवी मृत्यू

हार्दिक गुळघाने आणि आयुष चिडे अशी मृत्युमुखी पडलेल्या जीवलग मित्रांची नावे

चंद्रपूर प्रतिनिधी - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-चिमूर मार्गावरील चारगाव सिंचन तलावात बुडून दोन मित्रांचा मृत्यू झालाय. सेल्फीच्या नादात दोन जीवल

एसटी कर्मचार्‍यांवरील बडतर्फीची कारवाई तीव्र करणार : परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा
पुणे – खासगी, स्कूल बसना सरकारकडून परवानगी
यड्रावकर यांच्या विरोधात कोल्हापुरात शिवसेना आक्रमक | LokNews24

चंद्रपूर प्रतिनिधी – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-चिमूर मार्गावरील चारगाव सिंचन तलावात बुडून दोन मित्रांचा मृत्यू झालाय. सेल्फीच्या नादात दोन जीवलग  मित्रांनी आपला जीव गमावला. तलावाजवळ सेल्फी घेत असताना एक मित्र पाण्यात पडला, त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने पाण्यात उडी घेतली मात्र दोघेही बुडाले. हार्दिक गुळघाने (वय 19) आणि आयुष चिडे (वय 19) अशी मृत्युमुखी पडलेल्या जीवलग मित्रांची नावे आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मासेमारांच्या सहाय्याने दोघांनाही शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. 2 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर दोन्ही मृतदेह आढळून आले. दोन जीवलग मित्रांचा एकाचवेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.  

COMMENTS