Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात थंडीचा कडाका वाढणार

तीन दिवसांत तापमानात होणार मोठी घट

पुणे ः राज्यातील हवेत गारठा वाढला असून, पुढील तीन दिवस तापमानात मोठी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात सध्या कोरडे वातावरण

अतिवृष्टी, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात तात्काळ मदत करणार : मंत्री विजय वडेट्टीवार
सामान्य नागरिकांना ‘ विचारतेय ‘ कोण ? 
यंदाही ठाणे महापालिकेची फिरती विसर्जन व्यवस्था

पुणे ः राज्यातील हवेत गारठा वाढला असून, पुढील तीन दिवस तापमानात मोठी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात सध्या कोरडे वातावरण असून परिणामी गारठा वाढणार आहे. सध्या विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणसह विदर्भात कोरडं वातावरण राहणार असून यामुळे पहाटे आणि रात्रीच्या तापमानात घट होणार आहे. तर, दुपारी तापमानात किंचित वाढ होऊन हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात सध्या कोरडे वातावरण आहे. यामुळे पुढील तीन दिवस राज्याच्या काही जिल्ह्यात किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने पुढील तीन दिवस तापमान हे दोन ते तीन अंशाने कमी होणार आहे. राज्यात गुरुवार पासून आग्नेय दिशेने येणार्‍या बाष्पयुक्त वार्‍याचा वेग वाढणार असल्याने दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होणार असून क्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहनर आहे. तर 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात गुलाबी पहाट होत असून काही ठिकाणी दाट धुके पडण्याची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

COMMENTS