आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. त्या हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध पार्श

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. त्या हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध पार्श्वगायिका म्हणून आशा यांनी सुमारे १६,००० चित्रपट आणि चित्रपटेतर गाणी गायली आहेत. जगभरात आवाजाचे चाहते असलेल्या आशा भोसले यांनी हिंदी व्यतिरिक्त, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. कुटुंबाला आधार देण्यासाठी चित्रपटांमध्ये गाण्यास सुरुवात केली. आशा भोसले यांचे पहिले गाणे ‘माझा बाळ’ (१९४३) या मराठी चित्रपटातील ‘चला चला नाव वाला’ हे होते. त्यांचे पहिले बॉलिवूड गाणे ‘चुनरिया’ (१९४८) या चित्रपटातील ‘सावन आया’ हे होते. येथून संगीत आणि गाण्यांचा त्यांचा प्रवास पाच दशकांहून अधिक काळ चालला आणि आशा भोसले लवकरच भारतीय संगीतातील एक महान व्यक्तिमत्व बनल्या.. आशा यांची अद्वितीय प्रतिभा ही होती की, त्यांनी शास्त्रीय संगीत, गझल आणि पॉप संगीत अशा सर्व प्रकारच्या संगीतात सहजतेने गायन केले. गायकीत त्यांची सहजता हीच त्यांच्या यशस्वीतेची ही गमक होती. वयाच्या १६ व्या वर्षी, आशा भोसले यांनी ३१ वर्षीय प्रियकर, गणपतराव भोसले यांच्यासोबत कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले होते. गणपतराव हे लता मंगेशकर यांचे खाजगी सचिव होते. पण, हे लग्न १९६० मध्ये मोडले होते. त्यानंतर १९८० मध्ये, आशा यांनी राहुल देव बर्मन यांच्याशी लग्न केले. राहुल देव बर्मन हे त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होते. त्यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत हे लग्न यशस्वी राहिले. त्यांना तीन मुले आणि पाच नातवंडे आहेत. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या आता आपल्यात नसल्या तरी, त्यांच्या अजरामर गाण्यांमुळे त्या आपल्यापासून कधीही वेगळ्या होणार नाहीत. आशा भोसले यांनी आपल्या बहिणीच्या सुमधुर गायनशैलीपेक्षा आपली शैली जाणीवपूर्वक वेगळी ठेवत हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी कॅबरे आणि पाश्चात्त्य-प्रभावित गाणी सादर केली आणि त्यांचे पती आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली ‘तिसरी मंझिल’ (१९६६) मधील “आजा आजा” आणि “ओ हसीना झुल्फों वाली” यांसारखी अजरामर गाणी गायली. त्या नृत्यांगना हेलन यांचा आवाजही बनल्या आणि त्यांनी “पिया तू अब तो आजा” (कारवाँ, १९७१) व “ये मेरा दिल” (डॉन, १९७८) यांसारखी गाणी अजरामर केली. एकाच शैलीपुरते मर्यादित राहण्यास नकार देत, आशा भोसले यांनी उल्लेखनीय अष्टपैलुत्व दाखवले. उमराव जान (१९८१) मधील “दिल चीज क्या है” आणि “आँखों की मस्ती के” मधील तिच्या गझलांनी तिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. तिने नंतर इजाजत (१९८७) मधील “मेरा कुछ सामान” साठी आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार जिंकला.
भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना २००० साली ‘दादासाहेब फाल्के पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अमरावती विद्यापीठ आणि जळगाव विद्यापीठाने साहित्यातील डॉक्टरेट पदवी देऊन त्यांना सन्मानित केले. कला क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल “फ्रेडी मर्क्युरी पुरस्कार” या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नोव्हेंबर २००२ मध्ये, “बर्मिंगहॅम चित्रपट महोत्सव” विशेषतः आशाजींना समर्पित करण्यात आला होता. राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंह पाटील यांनी ५ मे २००८ रोजी आशाजींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार भारत सरकारच्या सर्वात महत्त्वाच्या पुरस्कारांपैकी एक आहे. अशाप्रकारे त्यांच्या गायकीच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रवासात अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. त्यांनी चित्रपटसृष्टीतील त्या महान कलाकारांचा उल्लेख केला, जे आता आपल्यात हयात नाहीत. त्या काळाचे कलाकार हयात नसल्याने आशा भोसलेंनी स्वतःला चित्रपटसृष्टीतील ‘शेवटची मुघल’ असे संबोधले. या विधानातून त्यांची प्रदीर्घ कारकीर्दच नव्हे, तर संगीतविश्वाला अनेक महान दिग्गजांचा आशीर्वाद लाभलेल्या त्या काळाबद्दल त्यांचा आदर व्यक्त केला आणि त्या काळातील त्या एकट्याच हयात होत्या म्हणून त्यांचे एकाकीपण देखील त्यातून व्यक्त झाले.
अभी ना जाओ छोड कर…’ या गाण्याच्या गायिका आशाताई यांनी आपल्या सर्वांना सोडून जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


COMMENTS