Homeताज्या बातम्यादेश

भारतीय तटरक्षक दलाकडून 24 बांगलादेशी मच्छिमारांना अटक

कोलकाता ः पश्‍चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बंगालच्या उपसागरात आंतरराष्ट्रीय सागरी सीमेचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय तटरक्षक दलाने 24 बांग

१०० सायकलस्वार करणार पाच राज्ये व बांगलादेशातून ३००० किलोमीटरचा प्रवास
बांगलादेशात रोहिंग्यांच्या दोन गटातील चकमकीत सहा जण ठार
भारतासोबत संबंध सुधारण्याचे बीएनपीचे संकेत

कोलकाता ः पश्‍चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बंगालच्या उपसागरात आंतरराष्ट्रीय सागरी सीमेचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय तटरक्षक दलाने 24 बांगलादेशी मच्छिमारांना अटक केली. नंतर त्यांना पश्‍चिम बंगाल पोलिसांच्या तटीय शाखेकडे सोपवण्यात आले. पहाटे गस्तीदरम्यान, तटरक्षक दलाच्या जहाजाला भारतीय पाण्यात एक बांगलादेशी मासेमारी ट्रॉलर दिसला. त्यानंतर तटरक्षक दलाच्या जहाजाने ट्रॉलरचा पाठलाग केला आणि तो भारतीय पाण्यात पकडला. प्राथमिक चौकशीनंतर, सोमवारी दुपारी मच्छिमारांना फ्रेझरगंज तटीय पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.
चौकशी दरम्यान, दाट धुक्यामुळे ते अनवधानाने भारतीय पाण्यात घुसले असा दावा मच्छिमारांनी केला. पण घुसखोरी अपघाती होती की, इतर काही हेतू होता हे निश्‍चित करण्यासाठी अधिक तपास सुरू आहे. अटक केलेले मच्छिमार कोणतेही वैध ओळखपत्र सादर करू शकले नाहीत. तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अटक केलेले मच्छिमार चुकून भारतीय पाण्यात घुसले नव्हते. पण वारंवार त्यांच्याकडे येत असत. त्यांनी पुढे सांगितले की, स्थानिक गस्त घालणार्‍या पथकांनी पुष्टी केली की हे मच्छिमार किनारपट्टीच्या भागात रिकामे आढळल्यानंतर वारंवार प्रवेश करत होते. वारंवार तक्रारींनंतर, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आणि आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

COMMENTS