Homeताज्या बातम्या

6 महिन्यात तरूणीचं तिसऱ्यांदा झालं लग्न

बिहार प्रतिनिधी - बिहार मध्ये एक अनोखी घटना घडली आहे. एका महिलेचे सहा महिन्यात तिसऱ्यांदा लग्न लावल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. सध्य

वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनबीड जिल्ह्यात 29.50 लक्ष रोपे तयार‘एक शाळा, एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम300 कोटी वृक्षारोपणासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
गर्दी टाळणारे निर्बंध घातले, शासन व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही : मुख्यमंत्री
चिंचोली काळदात येथे भाजपचे प्रशिक्षण शिबीर

बिहार प्रतिनिधी – बिहार मध्ये एक अनोखी घटना घडली आहे. एका महिलेचे सहा महिन्यात तिसऱ्यांदा लग्न लावल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. सध्या या लग्नाचा व्हिड़ीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिहारच्या बेगूसराय येथे एका विवाहीत महिलेला भेटायला गेलेल्या प्रियकराला ग्रामस्थांनी पकडले आणि त्याचे तिच्यासोबत बळजबरीने लग्न लावून दिले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोघं लग्न करण्यासाठी विरोध करत असताना ग्रामस्थांनी बळजबरीने त्यांचे लग्न लावून दिले. खोदावंदपुर परिसरातील बरियारपुर गावातील ही घटना आहे. बोलले जातेय की, महिलेचे सहा महिन्यात हे तिसरे लग्न आहे. आरती कुमारी (20) असे त्या महिलेचे नाव असून ती मुबारकपूर गावातील रहिवासी आहे. तिचे पहिले लग्न वीरपुर परिसरातील टांरी गावातील एका तरुणाशी झाले होते. मात्र फार काळ ते लग्न टिकले नाही. त्यानंतर दुसरे लग्न गावातील नीतीश कुमार नावाच्या तरुणाशी झाले. दरम्यान तिची ओळख नितीशचा मित्र सिंटूशी झाली आणि दोघं लपून छपून एकमेकांना भेटायचे. दरम्यान रविवारी रात्री दोघांना एकत्र ग्रामस्थांनी पाहिले आणि त्यांना पकडून गावातील एका मंदिरात बळजबरीने लग्न लावून दिले आणि दोघं तिथून निघून गेले. दोघांच्या नातेवाईक त्यांचा तपास करत आहेत. मात्र आतापर्यंत त्यांचा काही तपास लागलेला नाही. सध्या या लग्नाचा व्हिड़ीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

COMMENTS