Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगलीत 2 कोटी 45 लाखांच्या रक्तचंदनाचा साठा जप्त

मिरज / प्रतिनिधी : सरकारी यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केली जात असल्याचे पुष्पा चित्रपटाच्या माध्यमातून वास्तव मांडण्यात आले आ

जोड कालव्याची कामे तातडीने पूर्ण करा; विशेष बैठक लावून कालव्यांच्या भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लावा : पालकमंत्री
केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योगाला फटका : पी. आर. पाटील
वनव्याच्या ज्वालांनी वैराटगडावर लखलखाट: विघ्नसंतोषी लोकांमुळे पर्यावरणाचा र्‍हास

मिरज / प्रतिनिधी : सरकारी यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केली जात असल्याचे पुष्पा चित्रपटाच्या माध्यमातून वास्तव मांडण्यात आले आहे. याचीच प्रचिती आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी केलेल्या 2 कोटी 45 लाख 85 हजाराचे 983 किलो 400 ग्रॅम रक्तचंदनावर मिरजेत पोलीस आणि वन विभागाने धाड टाकून पकडले. यावेळी यासिन इनायतउल्ला (रा. अनेकळ, जि. बंगलुरु) याला ताब्यात घेण्यात आले.
आंध्र प्रदेशमधील जंगलातून मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी कशी केली जाते. यावर प्रकाश टाकणारा चित्रपट पुष्पा नुकताच प्रदर्शित झाला होता. याची मोठी चर्चा सर्वत्र होती. अशा प्रकारे रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधिक्षक अशोक विरकर आणि सपोनि रविराज फडणीस यांच्या पथकाने वन विभागाच्या साह्याने चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रविवारी पहाटे तस्करीचे रक्तचंदन मिरजेतून जाणार असल्याची माहिती रविराज फडणीस यांना मिळाली.
फडणीस यांनी मिरज-कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला. यावेळी फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून जाणारा के-13 6900 हा टेम्पो पोलिसांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 2 कोटी 85 लाखाचे 983 किलो 400 ग्रॅम चंदन असल्याचे निदर्शनास आले. आ अवैध साठा जप्त करण्यात आला असून हे रक्तचंदन नेमके आणले कोठून याचा तपास सांगली पोलीस करत आहेत.

COMMENTS