Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वोट बँक वाचवण्यासाठी शेतकर्‍यांचा बळी ः अजित नवले

टोमॅटोचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारचा हस्तक्षेप अयोग्य

अहमदनगर/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून टॉमटोने शंभरी पार केली असून, महानगरात हाच दर दीडशेच्या घरात पोहचला आहे. उशीरा झालेला पाऊस आणि कमी झाल

शिक्षक दिनी भारतीय स्टेट बँकेकडून सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान
नगरमध्ये दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष अग्रवालांचा तडकाफडकी राजीनामा

अहमदनगर/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून टॉमटोने शंभरी पार केली असून, महानगरात हाच दर दीडशेच्या घरात पोहचला आहे. उशीरा झालेला पाऊस आणि कमी झालेल्या आवकमुळे टोमॅटोचे दर कडाडले आहे. मात्र हेच दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने उडी घेतली आहे. यावरून किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेवर टीका केली असून, वोट बँक वाचवण्यासाठी शेतकर्‍यांचा बळी दिला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
सध्या टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली असून, टोमॅटोची टंचाई देखील भासत आहे. अशा स्थितीत दरवाढ कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाला (एनसीसीएफ) तातडीने टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयावर किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी भूमिका मांडली आहे. अजित नवले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार हस्तेक्षप करत आहे. या सरकारच्या हस्तक्षेपाचा मी निषेध करत असल्याचे नवले यावेळी म्हणाले. शेतकर्‍यांच्या बाजूने उभे राहायचे नाही, त्यांना आत्महत्या करायला लावायचे आणि दुसर्‍या बाजूला शेतकर्‍यांना दोन रुपये मिळत असताना आणखी शेतकर्‍यांना खड्ड्यात घालायचे हा अन्याय करणारा प्रकार केंद्र सरकार करत असल्याचे अजित नवले यावेळी म्हणाले. टोमॅटो अधिक उत्पादीत झाल्यामुळे टोमॅटोचे दर उतरले होते. याकाळात टोमॅटोचा चिखल रस्त्यावर झाला होता. शेतकरी टमॅटो काढून रस्त्याच्या कडेला फेूकून देत होते असे अजित नवले म्हणाले. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे शेतकर्‍यांना आपले टोमॅटो मातीमोल किमतीत विकावे लागले होते. टोमॅटो तोडण्याचा व वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी टोमॅटो अक्षरशः रस्त्याच्या कडेला फेकून देत होते. शेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकारला शेतकर्‍यांना मदत करण्याची इच्छा झाली नाही. आता मात्र मूठभर शेतकर्‍यांना दोन रुपये मिळू लागताच सरकार लगेच भाव पाडण्यासाठी सक्रिय झाले आहे. भाजपच्या केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत एकतर्फी आणि शेतकरीविरोधी आहे. किसान सभेच्या वतीने केंद्र सरकारच्या या एकतर्फी हस्तक्षेपाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करत असल्याचे नवलेंनी म्हटले आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार सातत्याने शेतकरीविरोधी भूमिका घेत आहे. आपली शहरी वोट बँक वाचवण्यासाठी शेतकर्‍यांचा सातत्याने बळी दिला जात आहे. आपल्या संकुचित राजकारणासाठी भाजपच्या राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणांचा परिणाम म्हणून राज्यात सर्वच शेतीमालाचे भाव कोसळले आहेत. शेतकर्‍यांना आपला कांदा 700 ते 800 रुपये क्विंटल दराने विकावा लागला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा यासह सर्वच शेतीमालाचे भाव हस्तक्षेप करुन पाडण्यात आले असल्याचा आरोप देखील डॉ. नवले यांनी केला आहे.  

केंद्र सरकार करणार नाफेडकडून टोमॅटो खरेदी – केंद्र सरकार नाफेडमार्फत महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील बाजार समित्यांमधून टोमॅटो खरेदी करणार आहे. हे टोमॅटो ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सध्या बाजारात टोमॅटोचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना स्वस्तात टोमॅटो उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. केंद्र सरकार महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून कांद्याची खरेदी करणार आहे. दोन ते तीन महिन्यापूर्वी विपरीत परिस्थिती शेतकर्‍यांवर आली होती. त्यावेळी सरकारला शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे यावसे वाटले नसल्याचे अजित नवले म्हणाले.

COMMENTS