मुंबई : मुंबईच्या लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी तीन डबे राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी थेट रेल्वेम
मुंबई : मुंबईच्या लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी तीन डबे राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलं आहे.पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लोकलचे तीन डबे राखीव ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये ही सुविधा द्यावी, अशी मागणी आहे.सध्या मुंबई लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डबे केल्यास त्यांना प्रवासात मोठा दिलासा मिळू शकतो, असा दावा तेजस्वी घोसाळकर यांनी केला आहे.आता रेल्वेमंत्री या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS