Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षणप्रश्‍नी तोडगा नाही, केवळ दिशाभूल

मनोज जरांगेंची टीका मुंबई मोर्चा काढण्यावर ठाम

जालना ः मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा निघाल्याची दिशाभूल सुरू आहे. अद्याप आरक्षण प्रश्‍नावर तोडगा निघालेला नसून राज्य सरकारकडून मराठा समाजाची

जामखेड तालुक्यात मनोज जरांगेंचे जल्लोषात स्वागत  
मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार
मनोज जरांगे यांची संगमनेरमध्ये आज जाहीर सभा

जालना ः मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा निघाल्याची दिशाभूल सुरू आहे. अद्याप आरक्षण प्रश्‍नावर तोडगा निघालेला नसून राज्य सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका मनोज जरांगे यांनी गुरूवारी केली. तसेच आपण मुंबईमध्ये मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. ते 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. जालन्याच्या आंतरवाली सराटीतून निघतील. त्यानंतर मजल दरमजल करत ते मुंबईला धडक देतील. त्यांच्या या आंदोलनाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे.
आरक्षणाचा तोडगा निघाल्यानंतरच्या चर्चावर माध्यमांशी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा – फिडगा निघाला नाही. या प्रकरणी सगेसोयरेच्या मुद्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. या प्रकरणी सरकारकडून केवळ दिशाभूल केली जात आहे. सरकारने मुंबई दौर्‍यात विघ्न निर्माण करण्यासाठी आमच्याविरोधात ट्रॅप रचण्यात षडयंत्र रचले आहे. यासाठी मराठा समाजातीलच काही असंतुष्ट नेत्यांची मदत घेतली जात आहे. त्यांना सरकारची फूस आहे. पण आम्ही त्यांचा हा कट उधळवून लावू, असे जरांगे म्हणाले.

सरकारच्या गोळ्या झेलण्यास तयार – मराठा समाज मुंबईला धडक मारणार आहे. मुंबईमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. सरकारने मला गोळ्या घालून ठार केले तरी चालेल. पण मराठा बांधवांनी आपली कजूट सुटू देऊ नका. माझे विचार मरू देऊ नका. आंदोलन थांबवू नका. तरच माझे बलिदान सार्थक होईल, अन्यथा नाही, असेही जरांगे यावेळी म्हणाले.

54 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या – सरकारने उगीचच हा विषय ताणू नये. 54 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या. तुम्ही मागील 3-4 महिन्यांत मोठ्या चुका केल्या. पुढील एका दिवसात नोंदी सापडलेल्या लोकांच्या नातलगांना प्रमाणपत्र द्या. आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही. पण सरकारने आम्हाला येथे येऊन वेड्यात काढू नये. या प्रकरणी सरकारने संभ्रम निर्माण करू नये. तसेच मराठा समाजानेही आपली दिशाभूल करून घेऊ नये, असे जरांगे यांनी राज्य सरकारला ठणकावले आहे.

COMMENTS