राजकीय पक्षांच्या ऑफर धुडकावत सामाजिक कामांनाच महत्व दिले : पोपटराव पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजकीय पक्षांच्या ऑफर धुडकावत सामाजिक कामांनाच महत्व दिले : पोपटराव पवार

नगर -  सध्याच्या परिस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेले अंत्योदयचे विचारच आज देशास तारू शकतात. तळागाळातील नागरिकांना उभे करत सुरक्षित कर

राहुरीत 11 सरपंचांसाठी 88 उमेदवारांचे गुडघ्याला बाशिंग !
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात 5 कोटींची कामे मंजूर ः आमदार मोनिका राजळे
शब्दगंधची ऑनलाइन श्रध्दांजली सभा उत्साहात

नगर –  सध्याच्या परिस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेले अंत्योदयचे विचारच आज देशास तारू शकतात. तळागाळातील नागरिकांना उभे करत सुरक्षित करण्याचे काम पतसंस्था चळवळ करत आहे. त्यामुळे पतसंस्था व्यवस्था टिकली पाहिजे. पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे कामकाजही दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारावरच चालत असल्याचे पाहून आनंद होत आहे. आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांकडून आमदार खासदार व मंत्रिपदाच्या ऑफर आल्या, मात्र सर्व धुडकावत मी सामाजिक कामांनाच महत्व दिले. सामाजिक कामांमुळेच मी आज राष्ट्रीय स्तरावर काम करत पूर्ण देशाची सेवा करू शकलो, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

            पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव पवार, मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे नूतन चेअरमन सुरेश वाबळे, संचालक कडूभाऊ काळे, शिवाजीराव कापळे, अजिनाथ हजारे तसेच भाजपचे नवनिर्वाचीत नगरसेवक प्रदीप परदेशी व अर्बन बँकेच्या संचालकपदी महेंद्र गंधे यांची निवड झाल्याबद्दल पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, सचिव विकास पाथरकर, ज्येष्ठ संचालक सुधीर पगारिया, प्रा.मधुसूदन मुळे, सुनील रामदासी, राजेंद्र चोपडा व अभय आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पतसंस्थेच्या २०२२ नव्या वर्षाच्या पॉकेट कॅलेंडरचे प्रकाशन पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. नगर शहरात असलेले मैदाने हे एकेकाळी नगरची शान होती. मात्र आता ही मैदाने ओस पडत आहेत, अशी खंत पोपटराव पवार यांनी व्यक्त करत मैदानांसाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन केले. सुरेश वाबळे म्हणाले, पतसंस्था चळवळ शहरी व ग्रामीण भागातही भरीव योगदान देत आहे. मोठ्याप्रमाणात सावकार शाही मोडीत काढण्याचे काम पतसंस्था चळवळ करत आहे. मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशन मुळे पतसंस्थांच्या कारभाराला शिस्त लावण्याचे काम होत असल्याने ही चळवळ पारदर्शक होत आहे.

पोपटराव पवार यांनी नगर शहराला दत्तक घ्यावे

            प्रास्ताविकात वसंत लोढा म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोपटराव पवार यांचा उचित सन्मान केला आहे. त्यांना पद्मश्री मिळायचा अभिमान दीनदयाळ परिवाराला आहे. पवार यांची जन्म व कर्मभूमी नगर शहर आहे. मात्र आज शहराची झालेली बिकट अवस्था याआधी कधीही झालेली नव्हती. त्यामुळे पोपटराव पवार यांनी आता शहरत लक्ष घालावे. नगर शहराला दत्तक घेवून हिवरेबाजार प्रमाणे नगर शहरही विकसित आदर्श करावे. हिवरेबाजार मुळे त्यांना पद्मश्री मिळाली तर नगर शहारामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळेल. यावेळी सचिन पारखी, अनिल रामदासी, धनंजय तागडे, आर.डी.मंत्री, बाळासाहेब खताडे, व्यवस्थापक निलेश लाटे व उपव्यवस्थापक सुखदेव दरेकर आदी उपस्थित होते. नरेंद्र श्रोत्री यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS