Homeकृषी

वरुणराजाच्या रौद्र अवतार: 40 शेळ्या-मेंढ्या गारठून ठार

खटाव / प्रतिनिधी : खटाव परिसरात बुधवारी रात्री अचानक हजेरी लावलेल्या पावसात हुसेनपूर शिवारात रामचंद्र चव्हाण या मेंढपाळाची गारठून 40 मेंढ्या ठार

पाचगणी येथील टेबल लॅण्ड पठारावर वीज पडून तीन घोड्यांचा मृत्यू
निकृष्ट बियाण्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान; कारवाई व नुकसानभरपाईची प्रहार संघटनेचे मागणी
कर्जमाफी व पीक विम्याच्या प्रश्नांवर कृषी मंत्र्यांना जाब-नुमान चाऊसशेतकर्‍यांच्या हक्कांसाठी मौलाना आझाद युवा मंचचे कृषी मंत्र्यांना निवेदन

खटाव / प्रतिनिधी : खटाव परिसरात बुधवारी रात्री अचानक हजेरी लावलेल्या पावसात हुसेनपूर शिवारात रामचंद्र चव्हाण या मेंढपाळाची गारठून 40 मेंढ्या ठार झाल्याने संपूर्ण मेंढपाळांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणी (ता. खटाव) येथील श्रीमंत शिंदे यांच्या हुसेनपूर येथील शेतात चव्हाण व त्यांचा मावस भाऊ यांनी गेली सहा दिवस कराराने मेंढ्या बसवल्या होत्या. अचानक रात्रीच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मेंढ्या सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली. मात्र, अंधार पडला असल्याने व चिखल झाल्याने त्यांना मर्यादा आल्या. परिणामी, 40 मेंढरे गारठून ठार झाली.
याबाबत अधिक माहिती अशी, की लोणी (ता. खटाव) येथील श्रीमंत शिंदे यांच्या हुसेनपूर येथील शेतात चव्हाण व त्यांचा मावस भाऊ यांनी गेली सहा दिवस कराराने मेंढ्या बसवल्या होत्या. अचानक रात्रीच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मेंढ्या सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली.
मात्र, अंधार पडल्याने व चिखल झाल्याने त्यांना मर्यादा आल्या. परिणामी, 40 मेंढ्या गारठून मृत झाली. काही अत्यावस्थ स्थितीत आहेत. एकदम 40 मेंढ्या दगवल्याने चव्हाण कुटुंबियांवर आकाश कोसळले आहे. शासनाने या घटनेची माहिती घेऊन त्वरित पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी विनंती चव्हाण दाम्पत्यांनी केली आहे.

COMMENTS