मुंबई - राज्यभरातील ऐतिहासिक आणि दुर्मीळ हस्तलिखिते तसेच ग्रंथांना आता डिजिटल संरक्षण मिळणार आहे. या साहित्याचे अत्याधुनिक पद्धतीने जतन, संवर्धन

मुंबई – राज्यभरातील ऐतिहासिक आणि दुर्मीळ हस्तलिखिते तसेच ग्रंथांना आता डिजिटल संरक्षण मिळणार आहे. या साहित्याचे अत्याधुनिक पद्धतीने जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्या पिढीला आपल्या समृद्ध ग्रंथसंस्कृतीशी जोडण्याच्या उद्देशाने, ग्रंथालय संचालनालयात हस्तलिखित सल्लागार समितीची पहिली बैठक नुकतीच ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

COMMENTS