Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्याबद्दल सकारात्मक ः मंत्री भुजबळ

श्रीरामपूर ः शासनाच्या वतीने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्‍वासन राज्याचे अन्न व नागरी पुर

पारनेर कारखाना विक्री प्रकरणी केंद्र सरकारला प्रतिवादी करण्याची परवानगी!
काल्याच्या कीर्तनाने वीरभद्र महाराज यात्रेची सांगता
Balasaheb Thorat : भारतीय जनता पार्टीचा जनाधार म्हणजे केवळ नौटंकी

श्रीरामपूर ः शासनाच्या वतीने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्‍वासन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले.
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे, कार्याध्यक्ष संजय पाटील, सचिव बाबुराव ममाणे, संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महागाईच्या निर्देशांकानुसार राज्यातील धान्य दुकानदारांना मार्जिन मध्ये वाढ करावी धान्य वाटपासाठी 5-जी पाँज मशीन देण्यात याव्यात वेळोवेळी सर्व्हरला येणारे अडथळे दूर व्हावेत. दुकानदारांनी विक्री केलेल्या धान्याचे मार्जिन दर महावेळेवर मिळावे, सर्व योजनेचे धान्य उपलब्ध करुन द्यावे, केरोसीन परवाना धारकांचे पुनर्वसन करावे आदी मागण्यांसाठी फेडरेशनच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात राज्यभरातील जवळपास 15 हजार दुकानदारांनी सहभाग नोंदवीला. चाचा नेहरु बालोद्यान आग्याराम देवी चौक येथुन मोर्चास सुरुवात झाली वेगवेगळ्या घोषणा देत हे मोर्चेकरी विधान भवनावर धडकले त्या ठिकाणी राज्यातून आलेल्या पदाधिकार्‍यांनी आपले मनोगत व्यक्त केले. फेडरेशनच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे,  कार्याध्यक्ष संजय पाटील, सचिव बाबुराव ममाणे, अशोक ऐडके, सुभाष मुसळे, बाबा राठोड आदिंच्या शिष्टमंडळाने राज्याचे पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवुन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष संजय पाटील नागपुरचे शहराध्यक्ष सुभाष मुसळे, रितेश अग्रवाल, संजय देशमुख, प्रफुल्ल भुरा, राजेश कांबळे, मिलींद सोनवणे, दौलत कुंगवाणी आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS