Homeकृषी

अहिल्यानगरमध्ये डाळिंबाला ‘सोन्याचा भाव’! किलोला तब्बल १९० रुपये दर; उसाला दर्जेदार पर्याय

राहुरी: उसाला पर्याय म्हणून डाळिंब लागवडीकडे वळलेल्या राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम अत्यंत आशादायी ठरत आहे. मल्हारवाडी परिसरातील

वांबोरीतील विठ्ठल मंदिर वाद चिघळला; कथित भेदभाव व स्वयंघोषित ट्रस्टविरोधात ग्रामस्थांचा धडक मोर्चा
लाखो रुपये खर्चून विकत आणलेल्या बसेस धुळखात! एका वर्षात विद्यापीठाची बस धावलीच नाही, खाजगी कंत्राटदाराला पोसण्याचा प्रकार?
गुरुपौर्णिमेनिमित्त सावली अर्बनमध्ये आदर्श शिक्षिकांचा सन्मान; ’सौभाग्यवती ठेव योजना’ विजेत्यांना बक्षीस वितरण
Pomegranate : डाळिंब या आजारांवर आहे रामबाण उपाय, काय आहेत त्याचे फायदे -  Marathi News | Pomegranate is a panacea for these diseases, what are its  benefits | TV9 Marathi

राहुरी: उसाला पर्याय म्हणून डाळिंब लागवडीकडे वळलेल्या राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम अत्यंत आशादायी ठरत आहे. मल्हारवाडी परिसरातील सुपर भगवा डाळिंबाला राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर तब्बल १९० रुपये प्रतिकिलो असा उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. २० किलो वजनाच्या एका पेटीला तब्बल ३ हजार ८०० रुपये मिळाल्याने डाळिंब उत्पादकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.

यंदा १५ जूनपासून डाळिंब विक्रीला सुरुवात झाली असून ऑगस्टअखेरपर्यंत बाजारात मोठ्या प्रमाणात आवक राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मल्हारवाडी परिसरात गेल्या काही वर्षांत ऊस पिकाला पर्याय म्हणून डाळिंब लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. योग्य बाजारपेठ, उत्तम उत्पादन क्षमता आणि अचूक व्यवस्थापन यामुळे डाळिंबाची शेती आर्थिकदृष्ट्या कमालीची फायदेशीर ठरू शकते, असा अनुभव उत्पादकांना येत आहे.

एकरी दोन लाखांचा खर्च:

डाळिंब शेती जितकी फायदेशीर आहे, तितकीच ती आव्हानात्मकही आहे. रोपे, खते, फोम पॅकिंग, रान बांधणी, मजुरी आणि वाहतूक यांसह विविध बाबींवर मोठा खर्च करावा लागतो. साधारणपणे प्रति एकर दोन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, योग्य नियोजन, योग्य व्यवस्थापन आणि रोग-किडींचे वेळच्या वेळी नियंत्रण केल्यास प्रति एकर सुमारे आठ टन उत्पादन मिळू शकते. त्यामुळे बाजारात चांगला दर मिळाल्यास डाळिंब उत्पादकांना भरीव उत्पन्नाची संधी निर्माण होते. यंदा मिळालेल्या १९० रुपये प्रतिकिलोच्या उच्चांकी दराने या पिकाच्या आर्थिक क्षमतेकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे.

किडींचे व्यवस्थापन महत्त्वाचे:

डाळिंबाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर किडींच्या प्रादुर्भावाचा मोठा परिणाम होतो. राहुरी कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्रज्ञांच्या मते, रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळेवर उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी लिंबोळी तेल ३ मिली, स्पिनोसॅड ०.५ मिली आणि स्टिकर ०.५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून वेळेवर फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. किडींचे वेळीच नियंत्रण केल्यास फळांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मोठी मदत होते.

उसाला उत्तम पर्याय:

डाळिंबाच्या एका पेटीला मिळालेला ३ हजार ८०० रुपयांचा दर हा केवळ एका व्यवहाराचा आकडा नसून डाळिंब उत्पादकांसाठी आशेचा मोठा किरण ठरला आहे. वाढता उत्पादन खर्च, मजुरी आणि व्यवस्थापनाच्या आव्हानांमध्ये असा चांगला बाजारभाव मिळाल्यास डाळिंब शेती शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताला मोठा आधार देऊ शकते. उसाला पर्याय, बाजारातील मोठी मागणी आणि योग्य व्यवस्थापनाला मिळणारा चांगला भाव या त्रिसूत्रीमुळे राहुरी परिसरातील डाळिंब शेतीला यंदा खरोखरच ‘सोन्याचा भाव’ मिळताना दिसत आहे.

COMMENTS