Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता प्रदूषणामुळे ढासळली

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही वर्षांपासून राजधानी दिल्लीची हवा कमालीची प्रदूषित झाली होती. त्यामुळे अनेक दिवस शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. म

अहमदनगर : शहरातील रस्त्यांसाठी ३५० कोटींचा निधी द्या.. मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गावरान आंब्याची चव महागणार
डिग्रस बू येथील अवैध रेती वाहतूक बंद करण्यात यावी ग्राम पंचायत घेतला ठराव 

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही वर्षांपासून राजधानी दिल्लीची हवा कमालीची प्रदूषित झाली होती. त्यामुळे अनेक दिवस शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. मात्र आता राजधानी दिल्लीनंतर मुंबईतील हवा कमालीची प्रदूषित झाली आहे. विविध उपाय योजना करुन देखील दिवसेंदिवस शहरातील हवेच्या गुणवत्तेचा आकडा खालवत चाल्ला आहे.

आता दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्राची राजधानी मुंबईची हवा देखील प्रदुषित होत चालली हे असे म्हणणे नाकारता येणार नाही कारण मुंबई शहरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आणि दिल्लीचा निर्देशांक सारखाच आहे. त्यामुळे मुंबईतील हवा भयंकर प्रदुषित झाल्याचे चित्र आहे. तरी मोठ्या प्रमाणावर होणार्‍या या वायु प्रदुषणावर सरकारचं मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. सबंधीत बाबीवर महाराष्ट्र सरकारने अजुन तरी कुठलही ठोस पाऊल उचललेलं नाही. तरी दिवसेंदिवस हवेच्या गुणवत्तेचा खालावणारा निर्देशांक मुंबईकरांसाठी चिंता निर्माण करणार आहे. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सध्या 245 वर गेला आहे. दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावे लागत आहे. रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे यांसारख्या समस्या वाढल्या आहेत.

मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 245 असून, तो धोकादायक श्रेणीत आहे. दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक देखील 245 वर आहे. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच प्रशासना कडून यावर ताबडतोब उपाययोजना करणं आवश्यक आहे. माझगावातील एक्यूआय 313 वर, चेंबुरमध्ये 319 तर बीकेसीतील एक्यूआय 300 च्या वर आहे. तर नवी मुंबईत हवेची गुणवत्ता 242 वर, अंधेरी 266, बोरीवली 132, वरळी 114, मालाड 232, कुलाबा 280, भांडूप 169 वर गेली आहे. मुंबई उपनगरातील इतर ठिकाणांवरील हवा गुणवत्तेत किंचित सुधारणा झाली आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक मुंबई शहराच्या तुलनेत सुरक्षित आहे असे म्हणता येईल.

COMMENTS