Homeताज्या बातम्याशहरं

दोन मुलींना कंबरेला बांधून विवाहितेची आत्महत्या

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील धामणी या गावात सौ. ऐश्‍वर्या स्वप्निल चव्हाण (वय 25) या विवाहित महिलेने आपल्या दोन मुलींना कमरेला ब

काव्यप्रहार
निसर्गानुभव कार्यक्रमात निसर्गप्रेमींना 374 वन्यप्राण्यांचे दर्शन
बॉर्डर दौड स्पर्धेत वडजलच्या सौ. तृप्ती काटकर-चव्हाण प्रथम

म्हसवड / वार्ताहर : माण तालुक्यातील धामणी या गावात सौ. ऐश्‍वर्या स्वप्निल चव्हाण (वय 25) या विवाहित महिलेने आपल्या दोन मुलींना कमरेला बांधून तलावात उडी टाकून आत्महत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सहा वर्षांपूर्वी स्वप्निल बापूराव चव्हाण (वय 30) यांचा ऐश्‍वर्या हिच्या समवेत कराड येथे विवाह झाला होता. त्यानंतर ते माण तालुक्यातील चव्हाण वस्ती येथे राहत होते. स्वप्नील हा गवंडी काम करून आपली पत्नी व तीन मुलींचा सांभाळ करत होता. सोमवार दि. 21 रोजी पत्नी ऐश्‍वर्या स्वप्नील चव्हाण मध्यरात्री घराशेजारी असलेल्या तलावात कु. स्वरांजली (वय 6) व कु. शिवानी (वय 3 महिने) दोन्ही मुलींना कमरेला बांधून तलाव्यात उडी टाकून आत्महत्या केली. तीन वर्षाची तिसरी मुलगी ही आजीजवळ झोपली होती. तीन मुलींना बरोबर घेऊन जाता आले नाही म्हणून ती वाचली. या घटनेमुळे माण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पती स्वप्नील बापूराव चव्हाण यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर मसवड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि सखाराम बिराजदार करत आहेत.

COMMENTS