Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची राज्य सरकारला सूचना

मुंबई/प्रतिनिधी ः मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी मनोज जरांगे यांनी गेल्या 17 दिवसांपासून उपोषण केले होते, मात्र राज्य सरकारने आश्‍वास

संसदेतील इंग्रजी प्रश्‍नावर नारायण राणेंचा गोंधळ
माझ्यावर बोलताना जयंत पाटलांनी अभ्यास करून बोलावं
आगामी निवडणुकीत गद्दारी खपवून घेणार नाही : नारायण राणे (Video)

मुंबई/प्रतिनिधी ः मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी मनोज जरांगे यांनी गेल्या 17 दिवसांपासून उपोषण केले होते, मात्र राज्य सरकारने आश्‍वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 96 कुळी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी भूमिका मांडली आहे.
यावेळी राणे यांनी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्याबाबत त्यांचे अभिनंदन केले आहे. मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी जुनीच आहे. याआधी 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. पण, कोर्टात प्रकरण गेल्याने आरक्षण टिकले नाही. मराठा आरक्षणाबाबत काहींनी टीका केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत अशी मागणी होत आहे. मला याबाबत वाटते की सरसकट असे आरक्षण देऊ नये. हा निर्णय घेताना सरकारने घटनेतील कलम 15/4 आणि 16/4 नुसार याचा अभ्यास करावा, असे राणे म्हणाले आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावे. सरसकट कुणबी दाखला हे 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही. त्यामुळे सरसकट याचा विचार करण्यापेक्षा घटनेतील तरतुदीनुसार मराठा समाजातील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दुर्बल घटकांचा अभ्यास व्हावा. महाराष्ट्रात 38 टक्के मराठा समाज आहे. जे गरीब आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी भूमिका नारायण राणे यांनी घेतली आहे. कोणत्याही जातीबाबत कोणाचं काढावं आणि कुणाचे घ्यावे अशा मताचा मी नाही. त्यामुळे घटनेतील तरतूदीप्रमाणे आरक्षण देण्याचा अभ्यास सरकारने करावा, अशी सूचनाही त्यांनी राज्य सरकारला केली आहे.

COMMENTS