Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांनीच शिवसेनेला भाजपपासून दूर केले  

छगन भुजबळांचा गौप्यस्फोटामुळे राजकीय खळबळ

मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडली असून, आता राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण रंगतांना

मराठ्यांच्या विजयानंतर छगन भुजबळ आक्रमक
ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी होवू देणार नाही  
महाविकास आघाडी आहे… एकमेकांचा सन्मान राखा…

मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडली असून, आता राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण रंगतांना दिसून येत आहे. मी छगन भुजबळांना ओळखण्यात कमी पडलो असे म्हणून येवलेकरांची जाहीर माफी मागत खा. शरद पवारांनी भावनिक सूर आळवला, तर रविवारी छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेवून शिवसेनेला भाजपपासून दूर करण्यात शरद पवारांचा मोठा हात असल्याचा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला आहे.
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, पवारांनी माफी मागण्याचे राजकारण चालवले आहे, मात्र त्यांनी माफी मागावी लागेल, असे कोणतेही काम मी येवल्यात केलेले नाही. तरीही माझ्यावर एवढा राग काढण्याचे कारण काय?, असा सवाल भुजबळांनी केला. शरद पवारांनी काल येवला येथे माफी मागितली तर यापुढे जिथे जिथे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसोबत गेले त्या सर्व मतदारसंघात ते माफी मागणार आहेत काय? शरद पवार आता काय 40-50 मतदारसंघात माफी मागतील काय? असा प्रतिसवाल भुजबळांनी यावेळी पवारांना केला. तसेच भुजबळ म्हणाले, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर या निर्णयाविरोधात शरद पवार पहिली सभा दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगाव या मतदारसंघात घेणार होते. मात्र, त्यांनी ती सभा रद्द केली आणि माझ्या येवला मतदारसंघात सभा घेतली. कदाचित शरद पवारांचे माझ्यावर अधिक प्रेम असावे, म्हणून त्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतली असावी. कदाचित शरद पवार यांना वाटत असेल की, जे काही झाले त्यामागे माझी मोठी भूमिका असेल. मात्र, असा समज करून घेणे चुकीचे आहे. शरद पवारांच्या घरातूनच बंड झाले आहे. ते का झाले? याचे आत्मपरिक्षण शरद पवार यांनी करावे. प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे साथीदार का सोडून गेले, याचा विचार शरद पवारांनी करावा. छगन भुजबळ म्हणाले, निवडणुकीत मला शरद पवारांनी येवला मतदारसंघ का दिला, याचा त्यांनाच विसर पडल्याचे दिसत आहे. विधानसभेसाठी 2004 मध्ये माझ्यासाठी एरंडोल, जुन्नर, वैजापूर, येवला हे पर्याय होते. वडिलांचे गाव असल्याने मला जुन्नरमधूनच लढायचे होते. पण कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने मी जुन्नरऐवजी येवल्यात लढलो. येवला हे मागासलेले असल्याने येथे विकासाचे काम करण्याची संधी होती. त्यामुळेच मी येवल्याचा आग्रह धरला होता. आणि येथून आमदार झाल्यावर मी येथे विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
 
सत्तेसाठी शरद पवारांची भाजपसोबत चर्चा – 2014 मध्ये तुम्ही शिवसेना सोडली, की आम्हीही काँग्रेस सोडू, असे शरद पवारांनी भाजपला सांगितले होते. आमच्या आमदारांची संख्या कमी होती म्हणून आम्ही भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला. त्यानंतर 2017 व 2019 मध्येही शरद पवारांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपशी चर्चा केली. शरद पवारांनीच शिवसेनेला भाजपपासून दूर केले, असा गौप्यस्फोटही छगन भुजबळ यांनी केला.

COMMENTS