Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या नेत्रदीपक सोहळ्यात भारताच्या सागरी संरक्षण क्षमतेत महत्त्वाची भर पडली आहे. स्वदेशी

‘गरीब विद्यार्थी फंडा’त १९ लाखांची जमा; दादा पाटील महाविद्यालयाचा आदर्श उपक्रम
शनैश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण अखेर मागे
‘समर्थ क्रॉप केअर’कडून कोट्यवधींची फसवणूक; वाढीव व्याजाचे आमिष; एजंट-गुंतवणूकदार हाणामारीनंतर प्रकार समोर

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या नेत्रदीपक सोहळ्यात भारताच्या सागरी संरक्षण क्षमतेत महत्त्वाची भर पडली आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ‘अरिदमन’ ही अणुऊर्जित पाणबुडी तसेच ‘तारागिरी’ ही अत्याधुनिक युद्धनौका अधिकृतपणे भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीचे कौतुक करत देशाच्या स्वावलंबी संरक्षण क्षमतेचा गौरव केला.
‘अरिदमन’ ही भारताची तिसरी अणुऊर्जित बॅलिस्टिक क्षेपणास्त्रवाहू पाणबुडी असून ती देशाच्या अणु प्रतिरोधक धोरणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. के-15 आणि के-4 प्रकारच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली ही पाणबुडी पाण्याखाली उच्च वेगाने हालचाल करू शकते. तिची अदृश्य राहण्याची क्षमता आणि अचूक मारक शक्तीमुळे समुद्रातील रणनीतिक संतुलन राखण्यात भारताला मोठा फायदा होणार आहे. आकारमान आणि क्षमतेच्या बाबतीत ‘अरिदमन’ ही याच श्रेणीतील आधीच्या पाणबुड्यांपेक्षा अधिक प्रगत मानली जाते. दरम्यान, याच मालिकेतील आणखी एक पाणबुडी सध्या समुद्री चाचण्यांच्या टप्प्यात असून लवकरच तीही सेवेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याच वेळी ‘तारागिरी’ ही आधुनिक युद्धनौकाही नौदलात समाविष्ट करण्यात आली. सुमारे सहा हजार सहाशे सत्तर टन वजनाची ही फ्रिगेट पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे प्रभावी उदाहरण मानली जाते. या युद्धनौकेत सुमारे पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. प्रगत अभियांत्रिकी कौशल्य, आधुनिक शस्त्रसज्जता आणि वेगवान प्रतिसाद क्षमतेमुळे ‘तारागिरी’ भारतीय नौदलाची ताकद अधिक भक्कम करणार आहे.

COMMENTS