Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या दोन गटात अंधाधुंद गोळीबार

बैलगाडा शर्यतीच्या वादातून राडा

अंबरनाथ प्रतिनिधी -  ठाण्याच्या अंबरनाथ एमआयडीसी भागात दोन गटात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. एका गटाने पहिल्यांदा गोळीबार केल्याने प्रत्युत्त

मायणीच्या यशवंत विकास सोसासटीत गुदगे गटाकडून येळगावकर गटाचा धुरळा
बाळासाहेबांच्या शिवसेनेला खंबीर सेनापती मिळाले – देवेंद्र लांबे
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगांनी सुचविले मोदींना पाच उपाय

अंबरनाथ प्रतिनिधी –  ठाण्याच्या अंबरनाथ एमआयडीसी भागात दोन गटात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. एका गटाने पहिल्यांदा गोळीबार केल्याने प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या गटानेही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोन गटांमध्ये वाद होऊन त्यांनी एकमेकांवर हा  गोळीबार करण्यात आला आहे. राहुल पाटील हे आपल्या कारमध्ये बसले असता त्यांच्या कारवर फडके गटाने गोळीबार केला. यावेळी पाटील यांच्या गटाने देखील दुसऱ्या गटावर गोळीबार केला..बैलगाडा शर्यतीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येतीय.

COMMENTS