Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालेगावमधून मौलानाला एटीएसने घेतले ताब्यात

मालेगाव प्रतिनिधी :- सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील विविध ठिकाणी एटीएस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकत अनेकांना ताब्यात घेतले होते. त्या

राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट
गुणरत्न सदावर्तेंना सरकारची सुरक्षा का ?
2024 ला सरकार बदलेल,सगळ्यांचा हिशोब हा केला जाईल

मालेगाव प्रतिनिधी :- सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील विविध ठिकाणी एटीएस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकत अनेकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर केंद्र सरकारने या संघटनेतील अनेकांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आणि अर्थपुरवठा संबंधित सहभागामुळे या संघटनेवर बंदी घातली होती. मात्र पुन्हा एटीएसने सोमवारी मालेगावमध्ये आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. मालेगावातून इमाम कौन्सिलचा अध्यक्षाला एटीएसच्या पथकाने अटक केली आहे.
मौलाना इरफान नदवी असे संशयित व्यक्तीचे नाव असून त्यास मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यात पीएफआय संघटनेची पाळेमुळे रुजल्याचे या प्रकरणावरून दिसून येत असून सातत्याने कारवाया होत असल्याने मालेगावमध्ये खळबळ उडाली आहे. पीएफआय आणि मालेगाव कनेक्शन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या एटीएसच्या कारवाईत मालेगावमध्ये एक मोठी कारवाई झाली होती. पीएफआयच्या संदर्भात अनेक धक्कादायक पुरावे हाती लागल्याने खळबळ उडाली होती. देशाच्या विरोधात कट रचणे, राममंदिर पाडणे यांसारख्या बाबी समोर आल्या होत्या, त्यामुळे एटीएसकडून आणखी सखोल तपास केला जात असून आज पुन्हा एकाला एटीएसने अटक केली आहे.देशाच्या गृहविभागाने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली असून देशभरात विविध पदाधिकारी यांच्या विरोधात ही कारवाई केली जात असून एटीएसची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. यापूर्वी मालेगाव येथून अटक केलेल्या यादीत मौलाना सहेफू रहेमान सईद अहमद याचा समावेश होता, त्यावरून संपूर्ण राज्यभर या कारवाईच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.

COMMENTS