Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये क्रूर पित्याने पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकलं

पत्नीसोबत वाद झाल्यानंतर कृत्य

अहमदनगर प्रतिनिधी - पती-पत्नीच्या भांडणात क्रूर पित्याने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घडना अहमदनगर जिल्ह्यात घडली

रस्ता मंजूर होऊनही विद्यार्थ्यांची चिखलातून कसरत  
दहावीच्या परीक्षेत प्रवरेच्या 14 शाळाचा शंभर टक्के निकाल
संत भगवान बाबांचे विचार समाजाला प्रेरणादायी – आ. संग्राम जगताप

अहमदनगर प्रतिनिधी – पती-पत्नीच्या भांडणात क्रूर पित्याने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घडना अहमदनगर जिल्ह्यात घडली. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. गोकुळ क्षीरसागर (वय 38 वर्षे, रा. आळसुंदे, कर्जत) असं क्रूर पित्याचं नाव आहे. तर ऋतुजा (वय 8 वर्षे) आणि वेदांत (वय 4 वर्षे) अशी मृत चिमुकल्यांची नावं आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये आळसुंदे गावात रविवारी (6 ऑगस्ट) ही घटना घडली. गोकुळ क्षीरसागर याचे आपल्या पत्नीसोबत भांडण झालं. यानंतर त्याने रागाच्या भरात आठ वर्षांची ऋतुजा आणि चार वर्षांचा वेदांत या आपल्या दोन मुलांना जवळच असलेल्या विहिरीत फेकले. या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे कर्जत तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कर्जत तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे.

COMMENTS