Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रीडा स्पर्धेतील गुणवंत खेळाडूंचा गुणगौरव

पाथर्डी प्रतिनिधी - शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात जास्तीत जास्त गुणवान खेळाडू तयार झाले पाहिजेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना अनेक क्रीडा स्पर्धेत

महामानवांचा अवमानप्रकरणी जामखेडकरांनी पाळला बंद
भाळवणी ते पिंपळगाव वाघा दिंडीचे प्रस्थान
हुतात्मा स्मारकाविषयी भाजप-मनसेचे उपोषण स्थगित  

पाथर्डी प्रतिनिधी – शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात जास्तीत जास्त गुणवान खेळाडू तयार झाले पाहिजेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना अनेक क्रीडा स्पर्धेत संधी मिळावी यासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहोत. तसेच खेळामधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. सकारात्मक विचार करण्याची क्षमता निर्माण होते. तसेच योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते.खेळामुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण होते या संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे तसेच प्रचंड कष्ट, मेहनत करावी. आपल्या आई-वडिलांचे व देशाचे नाव उज्वल करावे. विद्यार्थ्यांनी मोबाइलच्या आहारी न जाता मैदानावर येऊन किमान एक तास व्यायाम करावा असे प्रतिपादन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी खेळाडू गुणगौरव कार्यक्रमात व्यक्त केले.
पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे श्री विवेकानंद विद्यामंदिर व बाबूजी आव्हाड महाविद्यालय मधील यशस्वी खेळाडूंचा संस्थेचे वतीने नुकताच गुणगौरव समारंभ संपन्न झाला. महाविद्यालयातील व विद्यालयातील तालुकास्तर जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावरील सर्व क्रीडा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, मुख्याध्यापक शरद मेढे, पर्यवेक्षक संपत घारे, समन्वयक ज्ञानेश्‍वर गायके, क्रीडाशिक्षक विजय देशमुख, रावसाहेब मोरकर, सतीश डोळे,प्रमोद हंडाळ, सचिन शिरसाट, सुरेखा चेमटे, विठ्ठल धस, संदीप धायतडक, दीपक राठोड, अनिता भावसार, मनोज ढाकणे, भैय्या थोरात उपस्थित होते तसेच यावेळी बहुसंख्येने पालक उपस्थित होते. विवेकानंद विद्या मंदिरचे विविध क्रीडा स्पर्धेत तालुक्यात वर्चस्व दिसून आले. यात 14वर्षे वयोगट व 17 वर्षे वयोगट मुले व मुली या संघाने हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.14 वर्ष वयोगट मुले व 17 वर्षे वयोगट मुली या संघाने खो-खो या स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. 14वर्षे वयोगट मुली या संघाने कबड्डी स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला तसेच विद्यालयातील वैयक्तिक क्रीडा प्रकारात 45 विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. सर्व क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यालयास अजिंक्यपद प्रदान करण्यात आले.यावेळी सर्व खेळाडूंना अल्पोपहार व चहापान देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्ञानेश्‍वर गायके यांनी केले तर आभार विजय देशमुख यांनी मानले.

COMMENTS