Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात उद्यापासून जोरदार पाऊस

हवामान विभागाने वर्तवला अंदाज

मुंबई/प्रतिनिधी ः  राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पावसाची वाट बघत आहे, मात्र बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून सक्रिय होण्यास विलंब हो

डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस
पुलावरून पाणी वाहत असल्याने रुग्णवाहिकेत अडकला मृतदेह.
राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे

मुंबई/प्रतिनिधी ः  राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पावसाची वाट बघत आहे, मात्र बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून सक्रिय होण्यास विलंब होत होता, मात्र आगामी 72 तासांमध्ये मान्सून सक्रिय होऊन 23 जूनपासून राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मोसमी वार्‍यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती निर्माण झाली असून पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात मान्सून उशीरा दाखल झाला होता. 11 जून रोजी कोकणात मान्सूनचे आगमन झाले होते. त्यानंतर 15 जुलै रोजी मान्सून राज्यभरात पोहचणार होता. मात्र, अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनला मोठा फटका दिला. मान्सून अचानक थांबल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकर्‍यांची कामे खोळंबल्याचे चित्र दिसत आहे. सध्या मृग नक्षत्र सुरु आहे. अद्यापही या नक्षत्रात पाऊस झाला नाही. पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आगमन रखडलेल्या मान्सूनला येत्या काही दिवसांत पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. मोसमी वार्‍यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या मुंबई आणि नागपूर केंद्राने वर्तवला आहे.
पुढील तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे मुंबई, कोकण मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मान्सून होणार सक्रिय – महाराष्ट्रात मान्सून सध्या क्षीण झालेला असला तरी बुधवारी त्याने दक्षिण भारतात प्रगती केली. बंगालच्या उपसागरात वार्‍यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश भागात पाऊस सुरू झाला असून वार्‍याचा वेग 55 ते 60 किमी इतका वाढला आहे. उत्तर प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तर भारतात मान्सून जोर धरत आहे. या दोन्ही वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

COMMENTS