छत्रपती शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन

राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जगाला समतेची शिकवण दिली – डॉ. जयश्री थोरात

संगमनेर/प्रतिनिधी : शिक्षण व नोकरीत आरक्षण लागू करतांना शिक्षणातून विकासाची क्रांती घडविणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी जगाला समतेची शिकवण दि

संजय शिंदे यांची प्रहार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड
राहुरी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींवर महिलाराज
टाळेबंदी असलेल्या पारनेर तालुक्यातील गावांना अत्यावश्यक सेवेला परवानगी द्यावी

संगमनेर/प्रतिनिधी : शिक्षण व नोकरीत आरक्षण लागू करतांना शिक्षणातून विकासाची क्रांती घडविणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी जगाला समतेची शिकवण दिली असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृतीशताब्दी निमित्त यशोधन जनसंपर्क कार्यालयाने 100 सेकंद स्तब्ध उभे राहून त्यांना अभिवादन केले.

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित राजश्री शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित अभिवादन प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, रामहरी कातोरे,  पी वाय दिघे  आदि मान्यवर उपस्थित होते . महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे कोल्हापूर येथे मुख्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते. लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त त्यांना राज्यभरात अनेक ठिकाणी 100 सेकंद स्तब्धपणे उभे राहून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या कि,महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीबा फुले, डाॅ बाबासाहेब आंबेडकर,शाहू महाराज यांसह संत राष्ट्रपुरुषांचा मोठा वारसा लाभला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण सुरु करुन बहूजनांना विकासाची मोठी संधी निर्माण करुन दिली. त्यांनी कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले.  समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी देण्याच्या हेतूने धोरण त्यांनी आखले .जाती,प्रथा व अंधश्रध्दे विरुध्द त्यांनी आवाज उठविला .समाजात जागृती निर्माण केली .विज्ञानवादी विचार जोपासले. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला,  विधवा पुर्नविवाहला मान्यता दिली.  शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला यासह राधानगरी धरणाची उभारणी करुन जलसंधारणाचे महत्व समजावून दिली असल्याचेही त्या म्हणाल्या तर बाबा ओहोळ म्हणाले की,  विकासाच्या क्रांतीला सुरुवात करणारे राजश्री शाहू महाराज यांचे समतेचे विचार पुढच्या पिढ्यांनी सदैव जोपासले पाहिजे .,शाहू महाराजांनी बहुजनांना शिक्षणाची दारे खुली केली . त्यामुळे आज विविध समाजातील अनेक तरुण वेगवेगळ्या विभागात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.  महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा मोठा समृध्द वारसा असून तो पुढील पिढ्यांनी सातत्याने जपावा असे आवाहन ही त्यांनी केले .

COMMENTS