नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर अलवरमधील मौजपूर येथे धावत्या कारला आग लागली. या अपघातात 5 लोक जिवंत जळाले. बचाव पथकाला आग विझवल्यानंतर अ

नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर अलवरमधील मौजपूर येथे धावत्या कारला आग लागली. या अपघातात 5 लोक जिवंत जळाले. बचाव पथकाला आग विझवल्यानंतर अर्टिगा कारमधून फक्त हाडे मिळाली आहेत. कार चालक आग लागताच बाहेर उडी मारली होती. त्याला गंभीर अवस्थेत जयपूरला रेफर करण्यात आले आहे. माहितीनुसार, कारमधील प्रवासी मध्य प्रदेशातील श्योपूरचे रहिवासी होते. ते वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन श्योपूरला परत येत होते. पोलिसांना शंका आहे की आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती. हा अपघात बुधवारी रात्री 11 वाजता झाला.

COMMENTS