Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये ; १० जूनपर्यंत पावसात घट

मुंबई, दि १ : बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली, आणि आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. कि

राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण
नांदेडमध्ये अनोखं लग्न! ; ३,५०० गावकऱ्यांना रिटर्न गिफ्ट दिलं ‘सुरक्षा कवच’!
कामातच राम आहे; मतदारसंघात सेवा करण्याकडे कोल्हे परिवाराचे लक्ष : विवेक कोल्हे
Farmers should not rush sowing | शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये: कृषी  विभागाचे बळीराजांना आवाहन, काय आहे हवामानाचा अंदाज? - Mumbai News | Divya  Marathi

मुंबई, दि १ : बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली, आणि आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १० जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहे, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात ४० अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान ३५ ते ४० अंशामध्ये राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे.

कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून परत एकदा करण्यात येत आहे.

COMMENTS