Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड

निवडणूक अधिकार्‍यांची उडाली तारांबळ, मतदारांचा खोळंबा

अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी दुसर्‍या टप्यात 88 जागांसाठी मतदान होत असून, यामध्ये महाराष्ट्रातील 8 जागांचा समावेश आहे. या 8 जागांमध्ये वर्धा, अक

आरोग्य विभागाच्या परीक्षाप्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी : राजेश टोपे
संजय राऊतांच्या पुणे दौरा शिवसेनेच्या पथ्थ्यावर…. अनेकांचे पक्षप्रवेश
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बलशाली भारताचे स्वप्न साकार करावे ः प्रा. बाबा खरात

अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी दुसर्‍या टप्यात 88 जागांसाठी मतदान होत असून, यामध्ये महाराष्ट्रातील 8 जागांचा समावेश आहे. या 8 जागांमध्ये वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, परभणी, नांदेड, हिंगोली येथे मतदान होत आहे. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच अनेक मतदारसंघामध्ये ईव्हीएम बिघाडाच्या घटना घडल्यामुळे अनेक ठिकाणी मतदान ठप्प झाले होते. तर मतदारांचा खोळंबा झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.
काही ठिकाणी सकाळी 7 वाजता मतदान यंत्र बंद पडल्याने मतदान रखडले होते. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर काही वेळ मतदारांना प्रतीक्षा करावी लागली. ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने निवडणूक अधिकार्‍यांची तारांबळ उडाली. वर्धा, अमरावती, अकोला, हिंगोली येथे ईव्हीएम बंद पाडल्याच्या घटना घडल्या. अमरावतीत रुक्मिणीनगर शाळा क्रमांक 19 मधील खोली क्रमांक 5 मध्ये ईव्हीएम बंद पडले. तब्बल 15 मिनिटे येथील वोटिंग मशीन बंद पडले. यमुळे येथील मतदान रखडले. काही वेळाने मशीन मधील बिघाड दुरुस्त झाला.

यानंतर येथील मतदान सुरळीत सुरू झाले. वडरपुरा भागातील महापालिका शाळेतील मतदान केंद्रात ईव्हीएममध्ये बिघाड झाला. या केंद्रात तीन खोल्या आहेत. त्यापैकी खोली क्रमांत 1 मधील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान थांबले होते. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही देखील काही केंद्रांवर ईव्हीएम यंत्रात बिघाड झाला. उमरा येथील बुथ क्रमांक 333 वर मतदान यंत्र बंद पडले. येथील मतदान 7.30 वाजेपर्यंत खोळंबले होते. ईव्हीएम बदलण्यासाठी निवडणूक अधिकार्‍यांचे प्रयत्न सुरू होते. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातटाकळी येथेही मतदान यंत्र बंद पडले. तब्बल 1 तास हे ईव्हीएम बंद होते. यामुळे तासभर मतदार रांगेतच उभे होते. यामुळे केंद्राबाहेर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या. एक तासानंतर येथील ईव्हीएममधील बिघाड दुरुस्त करण्यात आला. यानंतर मतदान सुरळीत पार पडले. वर्धा जिल्ह्यातील टाकली येथील तर देवळी येथील यशवंत कन्या माध्यमिक शाळेच्या 185 क्रमांकाच्या केंद्रावर सकाळी मतदान यंत्रे बंद पडले. याचा फटका खासदार रामदास तडस यांना बसला. ईव्हीएम मशीन बंद पडल्याने ते 40 मिनिटे रांगेत उभे होते.

हिंगोलीमध्ये 39 मतदान केंद्रांवर खोळंबा – हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर पहिल्या 2 तासात मतदान प्रक्रिया खोळंबली होती. हिंगोलीत 39 बॅलेट मशीन आणि 16 कंट्रोल युनिट बदलले. तर 25 ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशीन बदलाव्या लागल्या. एकूण 39 हून अधिक मतदान केंद्रावर पहिल्या दोन तासांत मतदानात अडथळा आला. सकाळच्या टप्प्यात तापमान कमी असल्याने मतदारांनी सकाळी गर्दी केली होती. मतदान रखडल्यामुळे मतदार ताटकळले होते. यामुळे मतदानाचा टक्का घसरला. नांदेडच्या मतदान केंद्र 5 वरील ईव्हीएम मशीन बंद झाले होते. तासाभरापासून मतदान केंद्र बंद होते. याचा फटका मतदानावर दिसून येत होता.

COMMENTS