Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

रस्त्याच्या कामासाठी खंडणीची मागणी

अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड या महामार्गाचे काम करणार्‍या कंत्राटदारांचे बिले काढायचे नाही, जर तुम्ही बिले काढले तर तुमच्याकडे बघुन घेईन, अशी धम

उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी : सुरेश पाटील
धीरज बोर्डेचे ‘सिडको’ च्या परीक्षेत यश  
‘वृद्धेश्वर’वर आ. राजळे गटाचे वर्चस्व   दोन जागांसाठी लढत होणार ; बिनविरोध करण्यात अपयश  
नगर शहरात आशा टॉकीज चौकात खुलेआम अवैधरित्या शस्त्रांची विक्री – Dainik  Lokmanthan | दैनिक लोकमंथन

अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड या महामार्गाचे काम करणार्‍या कंत्राटदारांचे बिले काढायचे नाही, जर तुम्ही बिले काढले तर तुमच्याकडे बघुन घेईन, अशी धमकी देत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) प्रकल्प संचालकाला महिन्याला 50 हजार रूपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  अमरिश माणिकराव मानकर (वय 50, मुळ रा. अकोला, हल्ली रा. चिखलठाणा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. किरण शिवाजी राऊत (रा. कोल्हार खुर्द, ता. राहाता), संदीप भास्कर भगत (रा. बायपास रस्ता, शेंडी, ता. अहिल्यानगर) व ऍड. हर्षद चावला (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सावेडी, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

COMMENTS