Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंडेतून पाणी सोडण्याची घाई दबावापोटी नको

सुनीताताई भांगरे यांचे अधिकार्‍यांना आवाहन

अकोले/प्रतिनिधी ः निळवंडे डाव्या कालव्याचे काम करताना झालेला हलगर्जीपणा पहिल्या पाणी सोडण्याच्या चाचणीत उघड झाला आहे. त्यावेळी तालुक्यातील काही ग

डॉ. कुमार सप्तर्षी यांना जीवन गौरव पुरस्कार
बेरोजगारांना रोजगाराची सुवर्णसंधी… नावनोंदणी करण्याची गरज
कोरोना योद्ध्यांसाठी रेमडेसिव्हीर व ऑक्सिजन राखीव ठेवा : नगराध्यक्ष वहाडणे

अकोले/प्रतिनिधी ः निळवंडे डाव्या कालव्याचे काम करताना झालेला हलगर्जीपणा पहिल्या पाणी सोडण्याच्या चाचणीत उघड झाला आहे. त्यावेळी तालुक्यातील काही गावांमधील शेतकर्‍यांच्या शेत जमीनींचे आणि पिकांचे झालेले नुकसान विचारात घेता निळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याची घाई अधिकार्‍यांनी कोणाच्याही दबावाखाली येवून करु नये अन्यथा पुन्हा धरणावर जावून आम्हाला आंदोलन करावे लागेल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या व अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती सुनीताताई भांगरे यांनी दिला आहे.
       या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्रीमती भांगरे यांनी म्हटले आहे की, निळवंडे डाव्या कालव्यातून पाण्याची चाचणी घेण्यासाठी 31 मे 2023 रोजी पाणी सोडण्याची घाई करण्यात आली. वास्तविक या कालव्यांची कामे अद्यापही पूर्ण नाहीत अनेक ठिकाणी कामामध्ये   निष्काळजीपणा झाला असल्याने प्रथम चाचणीचे पाणी निंब्रळ, तिटमेवस्ती, मेहेंदुरी या गावातील शेतकर्‍यांच्या शेतामध्ये तसेच कालव्या   जवळील काही घरांमध्ये गेल्याने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही वस्तुस्थिती आपण त्याच वेळी आंदोलन करुन, जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देत पाणी तातडीने बंद करण्याची मागणी केली होती. आता पुन्हा याच डाव्या कालव्यामधून पाणी सोडण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. केवळ काही लोकांच्या हट्टासाठी या कालव्यातून पाणी सोडण्याची प्रक्रीया होणार असेल तर अकोले तालुक्यातील शेतकरी ती यशस्वी होवू देणार नाहीत. आधी कालव्यातील सर्व कामे पुर्ण करा, ज्या भागामध्ये पाण्याची गळती होते, पाण्याचा झिरपा होतो अशा भागातील कामांच्या पुर्ततेबाबतचे सर्व निकष पूर्ण करुनच कालव्यातून पाणी सोडावे ही आमची मागणी आहे. कालव्यांच्या कामातील चुकांकडे दुर्लक्ष करुन, जलसंपदा विभागाने कोणाच्या दबावाखातर किंवा कोणाच्या आदेशाने पाणी सोडले तर, तीव्र आंदोलन करण्याच इशारा आम्ही आजच देत आहोत. मागील वेळी शेतक-यांचे नुकसान झाले त्याचीच भरपाई शासन अद्याप देवू शकलेले नाही. आता पुन्हा या कालव्यांच्या पाण्यामुळे होणार्‍या नुकसानीचा बोजा अंगावर घेण्याची मानसिकता या भागातील शेतकर्‍यांची नाही, त्यामुळे शेतकर्‍यांच्या भावनांचा विचार करुन, जलसंपदा विभागाने डाव्या  कालव्यातून पाणी सोडताना गांभीर्याने विचार करावा अन्यथा होणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल. या संदर्भात आम्ही दोनच दिवसांमध्ये शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ घेवून जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना भेटणार असल्याचेही श्रीमती भांगरे यांनी सांगितले.

COMMENTS