Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठक

सातारा / प्रतिनिधी : टंचाई सदृष्य गावांसाठी मे महिन्यासाठी व जूनच्या काही दिवसांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. एकही गाव पिण्याच्या पाण्

जीप पलटी झाल्याने जेजुरीहून धुळदेवकडे निघालेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू
फलटणला होणारे राष्ट्रीय सामने यशस्वी पार पडतील : श्रीमंत रामराजे
ना. रामराजेंवर टिका करुन दुकान चालू ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न : प्रितसिंह खानविलकर

सातारा / प्रतिनिधी : टंचाई सदृष्य गावांसाठी मे महिन्यासाठी व जूनच्या काही दिवसांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
सातारा जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ना. पाटील बोलत होते. बैठकीला खा. श्रीनिवास पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. महादेव जानकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी विजया यादव उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा आहे. टंचाई काळात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यास कोणतीही अडचण भासणार नाही. टंचाईच्या काळात योग्य नियोजन करुन पिण्याच्या पाण्यापासून एकही गाव वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हा परिषदेने ज्या गावांमध्ये विंधन विहिरी खराब झाल्या आहेत. त्या दुरुस्तीची मोहिम हाती घ्यावी, असेही ना. पाटील यांनी बैठकीत सांगितले.
टंचाईच्या काळात विद्युत वितरण कंपनी व जलसंधारण विभागाने समन्वयाने काम कारावे. शेतीला पाणी सोडले तर ते जमिनीत मुरुन विहिरींनाही त्याचा लाभ होत आहे, असे खा. पाटील यांनी सांगितले. बैठकीला सर्व प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS