Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोगस बि-बियाण्यांसह खतांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी : पालकमंत्री

सातारा / प्रतिनिधी : यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकर्‍यांसाठी लागणारा खतांचा तसेच बि-बियाणां

मंगळवेढा तालुक्यात विषबाधा; दोन लहान मुलींचा मृत्यू
इस्लामपूर पालिका निवडणूकीत प्रभाग 10 मध्ये शिवसेनेला तगडे आव्हान
पाटणच्या कातकरी वस्तीतील नागरिकांचे लसीकरण

सातारा / प्रतिनिधी : यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकर्‍यांसाठी लागणारा खतांचा तसेच बि-बियाणांचा तुटवडा भासणार नाही. याबरोबरच बोगस खतांची व बि-बियाणांची विक्री होणार नाही. याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, असे निर्देश सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.
खरीप हंगाम-2022 पुर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पाटील बोलत होते. या बैठकीला खा. श्रीनिवास पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. महादेव जानकर, आ. अरुण लाड, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले, खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी होते. सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने शेतकर्‍यांनी बियाणांसाठी जतन केलेले बियाणे विकले आहेत. सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी. मराठवाड्यात तुर पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. त्याच पध्दतीने जिल्ह्यातही तुर पिक लागवड वाढविण्यावर कृषी विभागाने भर द्यावा, यासाठी जनजागृती करावी. कोरोना काळात कृषी विभागाने बांधावर जावून बियाणांची उगवन क्षमता या विषयी कृषी प्रात्यक्षिके घेतली होती. अशा प्रमाणेही शेतकर्‍यांच्या बांधावर प्रात्यक्षिके घ्यावीत. तसेच खातांचा व बियाणांचा बोगस पुरवठा होणार नाही. यासाठी भरारी पथके तैनात करुन कृषी दुकानांची वेळोवेळी तपासणी करावी. तसेच कोणत्या गावात किती ऊसाची लागवड आहे याची नोंद ठेवा, अशा सूचना करुन खरीप हंगाम-2022 यशस्वी करा, असेही पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत सांगितले.

COMMENTS