Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिग्दर्शक कुमार साहनी यांचे निधन

मुंबई ः माया दर्पण आणि ’तरंग’ सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक कुमार साहनी यांचे निधन झाले आहे. त्यांना समांतर सिनेमांचे प्रणेते मानले जाते. वयाच्

विकासाची नवी पहाट !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती; राज्य निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
स्वतःविरुद्धच गुन्हा दाखल करा! उपविभागीय अधिकार्‍यांचे थेट किनवट तहसीलदारांना पत्र; प्रशासकीय वर्तुळात प्रचंड संभ्रम

मुंबई ः माया दर्पण आणि ’तरंग’ सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक कुमार साहनी यांचे निधन झाले आहे. त्यांना समांतर सिनेमांचे प्रणेते मानले जाते. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. कुमार साहनी यांनी ’माया दर्पण’, ’तरंग’, ’ख्याल गाथा’ आणि ’कसबा’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांच्या दिग्दर्शनातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. दिग्दर्शकासोबतच कुमार साहनी यांनी लेखक आणि शिक्षक म्हणूनही आपला ठसा उमटवला. त्यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. कथा सांगण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीने त्यांना वेगळी ओळख मिळाली. दिग्दर्शक असण्यासोबतच ते शिक्षक आणि लेखकही होते.

COMMENTS