Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्यजीत तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नाही – नाना पटोले

पिता-पुत्रांनी काँग्रेसची फसवणूक केल्याचा केला आरोप

मुंबई/प्रतिनिधी ः नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मोठया राजकीय घडामोडी घडल्याचे दिसून आले. त्यानंतर काँगे्रसचे प्

इंधन दरानंतर खाद्य तेलांच्या किंमतीत घसरण
मुक्या प्राण्यांसाठी नगरमध्ये होणार 100 पाणवठे
पुण्यात महिन्याभरात 1.34 लाख दाखल्यांचे वितरण

मुंबई/प्रतिनिधी ः नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मोठया राजकीय घडामोडी घडल्याचे दिसून आले. त्यानंतर काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट तांबे पिता-पुत्राविरोधात दंड थोपटल्याचे शुक्रवारी दिसून आले. तांबे पिता-पुत्रांविरोधात पटोले यांनी दिल्लीत तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. सत्यजीत तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर करून व एबी फॉर्म देऊनही सुधीर तांबे यांनी काल अचानक निवडणुकीतून माघार घेतली व मुलाच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला. तांबे यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षात संताप आहे. नाना पटोले यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. सगळ्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. नाशिकमध्ये जे काही घडले, ते हायकमांडला कळवले आहे. हायकमांडचा निर्णय आज अपेक्षित आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल. बंडखोर उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार नाही, असे ते म्हणाले. ’पक्षाने सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. त्यांनी फॉर्म न भरता पक्षाची फसवणूक केली आहे. स्वत:च्या मुलाला अपक्ष उभे करून ते भाजपचा पाठिंबा घेणार आहेत. ही एक प्रकारची दगाबाजी आहे, असा संताप पटोले यांनी व्यक्त केला. भाजपवरही पटोले यांनी टीका केली. ‘भीती दाखवून घर फोडण्याची जी कामे भाजपने सुरू केलीत, त्याचा आता त्यांना आनंद होत असेल. पण ज्या दिवशी त्यांचे घर फुटेल, तेव्हा त्यांना खरे दु:ख समजेल, असा सूचक इशाराही पटोले यांनी दिला. ‘भाजप आणि तांबे यांचे आधीच ठरले होते हे आता स्पष्टच दिसत आहे. भाजपने अर्ज न भरल्याने ते उघडच झाले. त्या भागातील पदवीधर मतदारही हे सगळे पाहत आहेत. ते अडाणी नाहीत, असे पटोले म्हणाले. सुधीर तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे दाजी असून सत्यजीत तांबे हे भाचे आहेत. त्यामुळे पत्रकारांनी पटोले यांनाही याबाबत प्रश्‍न विचारला. त्यावर पटोले म्हणाले, ‘बाळासाहेब थोरात काल दुपारपर्यंत संपर्कात होते. मात्र, हे सगळे झाल्यानंतर त्यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही.’

COMMENTS