आ. संग्राम जगतापांसह त्या पाच मुलांना मांडावे लागणार म्हणणे…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. संग्राम जगतापांसह त्या पाच मुलांना मांडावे लागणार म्हणणे…

नगर आयटी पार्क प्रकरणी न्यायालयात दावा

अहमदनगर/प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यातून आयटी पार्कचे खोटे आश्‍वासन दिल्याचा दावा करणारा खटला जिल्हा न्यायालयात येथील निर्भय नवजीवन फाउंडे

प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करु : ना. उदय सामंत
दुचाकी-चारचाकी कारची समोरासमोर धडक; एकजण जागीच ठार
कराड पालिकेकडून वसुली विभागाचा कारवाईचा धडाका

अहमदनगर/प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यातून आयटी पार्कचे खोटे आश्‍वासन दिल्याचा दावा करणारा खटला जिल्हा न्यायालयात येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे अद्यक्ष संदीप भांबरकर यांनी दाखल केला असून, त्याच्या प्राथमिक सुनावणीनंतर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह आयटी पार्कचा प्रचार करणार्‍या पाच तरुणांना म्हणणे मांडण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. येत्या 16 डिसेंबरला या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
निवडणूक जाहीरनाम्यातून आयटी पार्कचे खोटे आश्‍वासन दिल्याबद्दल शहराचे आमदार व त्याच्या प्रचार करणार्‍या तरुणांना जिल्हा प्रधान मुख्य न्यायाधीश यांनी कोर्टात हजर होऊन त्यांची बाजू मांडण्याची नोटीस जारी केली असल्याची माहिती भांबरकर यांनी दिली. न्यायालयाने आमदार जगताप व त्यांचा प्रचार करणारे तरुण दीपाली शामसुंदर वर्मा, सोनाली रवींद्र भरताल, देवेंद्र अशोक वैद्य, संतोष क्षेत्रे व हरीश भोगाडे यांना न्यायालयात हजर होऊन बाजू मांडण्याची नोटीस दिल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा न्यायालयात आमदार जगताप व प्रचार करणार्‍या सर्व तरुण यांच्याविरुद्ध खासगी दावा दाखल केला असता त्यांना बाजू मांडण्याच्या नोटिसा निघाल्याचे भांबरकर यांनी सांगितले. यामुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती अशी की, 2019च्या विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात मतदारांना खोटे आश्‍वासन देऊन व दिशाभूल करुन अहमदनगर एमआयडीसी येथील आयटी पार्क कार्यान्वीत केल्याचे सांगणारे आमदार जगताप यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यासाठी भांबरकर यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयात खासगी दावा दाखल केला आहे. त्यावर नुकतीच 24 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. संबंधितांना म्हणणे मांडण्याच्या नोटीसा बजावल्यानंतर आता 16 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे, असे भांबरकर यांनी सांगितले.

माहिती अधिकारात घेतली माहिती
भांबरकर यांनी माहिती अधिकारात एमआयडीसी कार्यालयाकडे आयटी पार्कची माहिती घेतली असता, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी (मुंबई) यांच्या 26 ऑक्टोबर 2016 च्या परिपत्रकान्वये अहमदनगर औद्योगिक क्षेत्रातून आयटी पार्क वगळण्यात आला आहे. तर ती जागा इतर उद्योजकांना भाडे तत्वावर देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले होते. यावरुन आमदारांनी स्वयंघोषित आयटी पार्क उभे करुन मतदारांची जाहीरनाम्याद्वारे दिशाभूल केली असल्याचा आरोप भांबरकर यांनी केला होता. त्याविषयी त्यांनी जिल्हा न्यायालयात पुराव्यानिशी दावा दाखल केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निवडणूक लढवली. त्यांनी जाहीरनाम्यामध्ये आयटीपार्क सुरु केला असल्याचे दर्शवले. तर युवक-युवतींना आयटी पार्कमध्ये रोजगार उपलब्ध करुन दिल्याचे जाहीर केले. काही तरुण-तरुणींनी व्हिडिओद्वारे आयटी पार्क चालू झाला असून, आम्हाला रोजगार मिळाल्याचे सांगितले. भांबरकर यांनी आयटी पार्कबद्दल माहिती घेतली असता शहरात आयटी पार्कच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी माहिती अधिकार 2005 अन्वये एमआयडीसी कार्यालयाकडे आयटी पार्कविषयी माहिती मागितली. त्यामध्ये एमआयडीसी कार्यालयाला आपल्यामार्फत परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती त्यांना 10 ऑगस्ट रोजी मिळाली. त्यामध्ये एमआयडीसी कार्यालयाचे असे म्हणणे आहे की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सहमुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई यांचे परिपत्रक 26 ऑक्टोंबर 2016 अन्वये अहमदनगर औद्योगिक क्षेत्रामधील आयटी पार्क वगळण्यात आला आहे. ही आयटी पार्कची जागा इतर उद्योजकांना भाडेतत्वावर देण्यात आली आहे. या पत्रावरुन आमदार जगताप यांनी सर्व मतदार व नागरिकांची दिशाभूल केली असल्याचे भांबरकर यांनी याआधी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. तसेच आमदार जगताप यांनी जाहीरनाम्याच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून, तसेच निवडणूक प्रचारात आयटी पार्क चालू केला आहे असे खोटे सांगितले आहे, असा दावाही यावेळी त्यांनी केला होता.

पोलिसांनी घेतली नाही दखल
निवडणूक प्रचारादरम्यान व्हिडिओद्वारे नोकरी मिळाली असे सांगणारे युवक-युवती यांनी देखील फसवणूक केली असल्याचे भांबरकर यांचे म्हणणे होते. यावरुन आमदार व खोटी माहिती सांगणारे युवक-युवतींवर गुन्हे दाखल करण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यात आला होता. मात्र, पोलीस स्टेशनने हा अर्ज स्वीकारला नाही. यानंतर पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज देण्यात आला. पण, त्यावरही कारवाई झाली नसल्याने जिल्हा न्यायालयात खासगी दावा दाखल केला आहे.त्यावर दि. 24 रोजी जिल्हा मुख्य प्रधान न्यायाधीश यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी आमदार जगताप व त्यांचा प्रचार करणारे तरुण दीपाली वर्मा,सोनाली भरताल,देवेंद्र वैद्य,संतोष क्षेत्रे व हरीश भोगाडे यांना न्यायालयात हजर होऊन बाजू मांडण्याची नोटीस दिली आहे, असे भांबरकर यांनी सांगितले.

COMMENTS