गेवराई तालुक्यातील नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांशी प्रीतम ताई यांनी  साधला संवाद….

Homeकृषी

गेवराई तालुक्यातील नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांशी प्रीतम ताई यांनी साधला संवाद….

गेवराई तालुक्यातील मारफळा भेड, भेंड टाकळी, जातेगाव बोकुडदरा, चोपडेवाडी टाकळगव्हाण , काठोडा तांडा रामराव गड, राजापूर ,तलवाडा आदी भागातील अतिवृष्टी

पारंपारीक शेतीला फाटा देत केला ड्रॅगन फ्रुट शेतीचा यशस्वी प्रयोग 
शेतकऱ्यांना जुन्या दराने खताची विक्री करावी : कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन
माझी वसुंधरा अभियानात शिर्डी नगरपंचायतीची कामगिरी सर्वोत्तम

गेवराई तालुक्यातील मारफळा भेड, भेंड टाकळी, जातेगाव बोकुडदरा, चोपडेवाडी टाकळगव्हाण , काठोडा तांडा रामराव गड, राजापूर ,तलवाडा आदी भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसान व गाव लगत फुटलेले तळे,आदी भागाचा खासदार प्रितम  मुंडे व आमदार लक्ष्मण आण्णा पवार ,यांनी पाहणी दौरा केला .खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी खास करून या भागातील शेतकरी शेतमजूर महिला यांच्यासोबत संवाद साधला .शासनाकडून सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई व पीक विमा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार तसेह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मोफत राशन  देण्यात यावे या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी सर्व मूलभूत गरजा वेळेवर प्रशासनाने या नागरिकांना देण्यात यावे अशी सूचना खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी दिल्या यावेळी  भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश प्रकाश सुरवसे, सभापती दीपक नाना सुरवसे, तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी सानप यांच्यासह  आदी उपस्थित होते  

COMMENTS