Homeताज्या बातम्याशहरं

आ. शशिकांत शिंदे यांच्या भाजपात प्रवेशादरम्यान स्वागतासाठी आ. महेश शिंदेचे मिठी मारण्याची तयारी

कोरेगाव / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आ. शशिकांत शिंदे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असतील, तर त्यांचे मी घट्ट मिठीत घेऊन स्वा

सोनं महागले; पाच महिन्यातील उच्चांकी पातळीवर
लोणंद येथील अतिक्रमणे हटविण्याबाबत सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस
संगमनेर शहरात त्या ठिकाणी दुषित जलशुद्धीकरण संयंत्राला स्थानिकांचा विरोध

कोरेगाव / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आ. शशिकांत शिंदे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असतील, तर त्यांचे मी घट्ट मिठीत घेऊन स्वागत करेन. कारण, त्यातून मी असा अर्थबोध घेईन की त्यांना त्यांचे नेते चुकीचे होते याची उपरती झाली असेल, असे मत शिवसेनेचे आमदार व सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी आ. महेश शिंदे यांना पत्रकारांनी आ. शशिकांत शिंदे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत काय? चर्चा आहे? असा प्रश्‍न विचारला असता त्यावर महेश शिंदे म्हणाले, मला आनंद होईल; पण खर तर हा प्रश्‍न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीमधील आहे. तसे म्हटले तर आज अनेकजण पक्ष प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. पण तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होऊ शकतो. आज खळं उठलं आहे, वस्ती उठायला वेळ नाही लागणार. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरही भाजपच्या वाटेवर असल्याचा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी पुन्हा हा प्रश्‍न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीतील असल्याचे स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळात आपला समावेश होऊ शकेल का? असे विचारता महेश शिंदे म्हणाले, आमचे नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्णतः विश्‍वास असल्यामुळे मला संधी मिळेल, असा विश्‍वास वाटतो.
जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखाना आपण सहा महिन्यांत सभासदांच्या ताब्यात घेऊ, असे आपण विधान केले असून, त्याला आधार काय? असे पत्रकारांनी विचारले असता शिंदे म्हणाले, मी जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखाना हा सहा महिन्यांत नव्हे, तर साडेतीन महिन्यांत सभासदांच्या ताब्यात घेऊ, असे म्हटले आहे. असे जे मी बोललो आहे ते मी माझ्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या विश्‍वासावर बोलतो आहे. जरंडेश्‍वर कारखाना असेल किंवा रयत शिक्षण संस्था असेल या संस्था जिल्ह्याच्या आहेत. त्या ताब्यात असाव्यात, अशी जनतेची इच्छा असल्यामुळे आणि त्याला वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ असल्यामुळे मी त्याचा पाठपुरावा नेत्यांकडे करत आलो आहे. त्यामुळे हे नक्की घडेल, असा मला विश्‍वास आहे.

COMMENTS