Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीकस्पर्धेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

नाशिक - वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात, उत्पादनात आणि तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत ज

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना सुरू होणार नाही : सहकारमंत्री
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठक
तुकडे बंदीचा फटका सर्वसामान्यांना; शासनाने फेरविचार करण्याची गरज

नाशिक – वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात, उत्पादनात आणि तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धेमध्ये सहभागी होतील, या दृष्टीकोनातून रब्बी हंगाम 2023 पासून पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर रबिवण्यात येणार आहे. त्यानुसार कृषि विभागाच्या सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर, 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.

*पीक स्पर्धेतील पिके :-* रब्बी पिके ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस (एकूण 5 पिके)

*पात्रता निकष :*

 स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

*अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -*

 विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

*अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख:-*

 रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रू. ३०० प्रवेश शुल्क  राहील तर आदिवासी गटासाठी रक्कम रू १५०/- इतके राहणार आहे. दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतक-यांनी पीकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. पीकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधुमगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in  ला भेट द्यावी, असेही विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी कळविले आहे.

COMMENTS