Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल – आमदार बच्चू कडू

अमरावती प्रतिनिधी- काल सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी

मराठ्यांच्या ओबीसीकरणास विरोध ः तायवाडे
राज्यात सोमवारी सुटी जाहीर
बोरगाव येथे स्वीट दुकानाला आग, दुकानं पूर्ण भस्म होऊन लाखो रुपयांचे नुकसान.

अमरावती प्रतिनिधी- काल सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी महत्त्वाचं विधान करत 20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आता सर्व अडथळे दूर झाले आहे. त्यामुळे लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे कुणाला कराल न कराल तो नंतरचा भाग आहे. कारण एका मंत्राकडे चार ते पाच खाते चा पदभार आहे. त्यामुळे गोंधळलेली अवस्था आहे त्यामुळे लोकांची कामे निकाली निघावे. यासाठी लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे तसेच मला एकनाथ शिंदे यांनी मंत्री पद देण्याच आश्वासन दिलं होतं एकनाथ शिंदे हे शब्दाचे पक्के आहे ते शब्द पाळणार आहे तर विधानसभा अध्यक्ष 16 आमदारांना अपात्र ठरवणार नाही, एकनाथ शिंदे यांनी कागदपत्री यशस्वी लढा जिंकला असेही विधान बच्चू कडू यांनी केलं तर मंत्रिमंडळ विस्तार आता खरच 20 ते 21 तारखेला होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं. 

COMMENTS