Homeताज्या बातम्यामनोरंजन

वयाच्या ६०व्या वर्षी आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर

मुंबई प्रतिनिधी - आपल्या खलनायकी शैलीमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत लोकप्रिय ठरलेले अभिनेते आशिष विद्यार्थी सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहेत. त्

सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्षे तरी लागणार नाही : भरत गोगावले
भीषण अपघातात ५ तरुण मजुरांचा दुर्दैवी मृत्यू | LokNews24
प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार

मुंबई प्रतिनिधी – आपल्या खलनायकी शैलीमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत लोकप्रिय ठरलेले अभिनेते आशिष विद्यार्थी सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहेत. त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली आहे. आशिष यांनी ६० व्या वर्षी आसामच्या रुपाली बरुआशी गुपचूप लग्न केलं आहे. त्यांनी गुरुवारी, २५ मे रोजी त्यांच्या जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. आशिष यांनी हिंदीसोबतच, मराठी, तेलुगू, तामिळ, कन्नडा, इंग्लिश अशा जवळपास सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक म्हणून अभिनेते आशिष विद्यार्थी यांना ओळखलं जातं. आता त्यांनी ही आनंदाची बातमी देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. आशिष यांनी विवाह करत सर्वांनाच चकित केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, आशिष यांनी आसाममधील प्रसिद्ध फॅशन इंटरप्रिटर असणाऱ्या रुपाली बरुआ यांच्याशी लग्न करत सर्वांनां खुशखबर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी कोलकत्तामधील एका क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लग्नगाठ बांधली आहे. आशिष आणि रुपाली यांनी आसामी पद्धतीने विवाह केला आहे.आशिष यांनी त्यांच्या लग्नाबद्दल पत्रकारांशी बोलताना आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणं ही एक असामान्य भावना असल्याचं म्हटलं आहे. चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्यांचे फोटो चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल झाले आहेत

COMMENTS