Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्ता-संघर्षावर विधानसभा अध्यक्षांचा वेळकाढूपणा

अ‍ॅड. असीम सरोदेंचा नार्वेकरांवर गंभीर आरोप

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्ता-संघर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांना

धक्कादायक, कपडे धुवायला गेलेली महिला रक्ताच्या थारोळ्यात
मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मोटर सायकल रॅलीचे आयोजन
रत्नदीपच्या डॉ. भास्कर मोरेनी जामीन अर्ज घेतला माघारी

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्ता-संघर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे. मात्रप्रकरणी होत असलेल्या विलंबाबद्दल ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असतांनाच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय घेण्याबाबत वेळकाढूपणा करत असल्याचा गंभीर आरोप अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केला आहे.
शिवसेनेत बंडखोरी केलेल्या आमदारांची सुनावणी लवकरच विधानसभा अध्यक्ष घेणार आहे. 56 दिवस 56 आमदारांची बाजू राहुल नार्वेकर ऐकणार आहेत. त्यानंतर ते आपला निर्णय जाहीर करू शकतात. पण, आमदार अपात्रतेचा निकाल लागू नये म्हणून विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत आहेत. असा आरोप सरोदे यांनी नार्वेकर यांच्यावर केला. सुनावणीला वेळ लागावा म्हणून नवीन नवीन योजना आखल्या जात आहेत. असा आरोप सरोदे यांनी केले. पुढे बोलताना सरोदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणी 141 पानांचा निकाल दिला होता. त्या परिच्छेद 110 आणि 111 मध्ये रिझनेबल टाईममध्ये या प्रकरणाचा निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. पण, रिझनेबल टाईम किती दिवस? किती वेळ? असे सांगितल नाही. त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. ही संवैधानिक अनैतिकता आहे. मणिपूरमधील के. मेघचंद्र विरुद्ध विधानसभा अध्यक्ष आणि राजेंद्र सिंह राणा प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले की, सामान्य परिस्थिती असेल, तर तीन महिन्यांत निकाल दिला पाहिजे. गुंतागुंतीची परिस्थिती असेल तर तीन महिने आणि सामान्य परिस्थिती असेल तर 3 महिन्यांमध्ये निकाल लागला पाहिजे. मात्र, 16 आमदारांच्या संदर्भात कोणतीही गुंतागुंतीची परिस्थिती नाही, असे असीम सरोदे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर कार्यवाही करण्याचे काम राहुल नार्वेकरांना करायचे होते. पण, कोणतेही काम राहुल नार्वेकरांनी केलेले नाही. नार्वेकरांनी वेळकाढूपणासाठी शिवसेनेची मूळ घटना अभ्यास करायची आहे, असे सांगून निवडणूक आयोगाकडे त्याची मागणी केली. घटनेचा अभ्यास करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा काही संबंधच नाही, असे असीम सरोदेंनी स्पष्ट केले.

COMMENTS