Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विमान कंपन्यांना खाडी हवाई क्षेत्र टाळण्याचे निर्देश

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील विमान वाहतुकीवर सावट दाटले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नागर

हिंद महासागरात तणावाची ठिणगी; इराणचा अमेरिकेच्या तळावर हल्ला
हल्ले सुरूच राहिल्यास इंधन आणीबाणीचे संकट
अ. भा.मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन 18,19 एप्रिल रोजी उदगीर येथे होणार; मुख्यमंत्री येणार : बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील विमान वाहतुकीवर सावट दाटले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. खाडी प्रदेशातील संवेदनशील हवाई क्षेत्र टाळून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, तसेच संभाव्य धोक्यांचा सखोल आढावा घेऊन आकस्मिक परिस्थितीसाठी सज्ज राहावे, असे आदेश सर्व विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात येत असून, त्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः इराण आणि इराकच्या हवाई क्षेत्रांवरील निर्बंधांमुळे काही विमान कंपन्यांना अधिक लांब आणि वळणावळणाचे मार्ग स्वीकारावे लागत आहेत. परिणामी, उड्डाणांचा वेळ वाढत असला तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट होते. याच पार्श्‍वभूमीवर, राष्ट्रीय विमान कंपनीला उड्डाण कर्तव्याच्या नियमांमध्ये तात्पुरती शिथिलता देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. परिस्थिती सामान्य होईपर्यंत ही सवलत कायम राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. केंद्रातील नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. पश्‍चिम आशिया हा भारतासाठी तसेच युरोप आणि अमेरिकेकडे जाणार्‍या हवाई वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी अवलंबून आहेत, असे त्यांनी नमूद केले. सेवा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार आणि विमान कंपन्यांमध्ये सातत्याने समन्वय साधला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तथापि, काही विमानतळ तात्पुरते बंद असल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. या आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे नायडू यांनी अधोरेखित केले. पश्‍चिम आशियातील सध्याचा संघर्ष तीव्र होत चालला असून त्याचे परिणाम केवळ लष्करी मर्यादेत न राहता जागतिक वाहतूक आणि ऊर्जा व्यवस्थेवरही उमटू लागले आहेत. खाडी प्रदेशातील अस्थिरतेमुळे होर्मुज सामुद्रधुनीतील हालचालींना अडथळे निर्माण झाले असून, ऊर्जा पुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. ऊर्जा प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे.

COMMENTS