Homeताज्या बातम्यामनोरंजन

अक्षराला घेऊन अधिपती चढणार खंडेरायचा गड, सुरु होणार मास्तरीण बाईंचा नवा संसार

पुणे प्रतिनिधी - झी मराठीवरील अनेक मालिकांनी अलीकडच्या काळात टीआरपी अभावी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या वाहिनीवरील शिवानी रांगोळे, ऋषिकेश

55 प्रवाशांनी भरलेली बस बुलढाण्याच्या घाटात पलटली
पुण्यात माथाडी नेत्याच्या नावाखाली लुटमार
धार्मिक स्थळे आणि कोरोना !

पुणे प्रतिनिधी – झी मराठीवरील अनेक मालिकांनी अलीकडच्या काळात टीआरपी अभावी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या वाहिनीवरील शिवानी रांगोळे, ऋषिकेश शेलार, कविता लाड स्टारर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरते आहे. अलीकडेच ‘तुला शिकवीन….मध्ये अक्षरा आणि अधिपती यांचा शाही लग्नसोहळा पार पडला. साखरपुडा, हळद, लग्न समारंभ असे सर्व विधी मोठ्या दिमाखात दाखवले गेले. याचा फायदा मालिकेला लोकप्रियता मिळवण्यात झाला असून आता अक्षरा अधिपतीच्या लग्नानंतरचे कथानक सुरू झाले आहे. चाहत्यांमध्ये ‘अधिक्षरा’ नावाने लोकप्रिय असणारी ही जोडी आता मालिकेत खंडोबाच्या दर्शनासाठी गेली आहे. यानंतर त्यांच्या नात्याला वेगळे वळण मिळू शकते. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय आणि दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह प्रेक्षकांनी अनुभवला. दोघांच्या लग्नामध्ये आणि लग्नानंतर अनेक अडचणी येताना दिसत आहेत. अशातच अक्षरा अधिपती दोघं जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला जाणार आहेत.या मालिकेच्या नवीन भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडिया आणि टीव्हीवर दाखवला जातो आहे. शिवाय अधिपती आणि अक्षरा या जोडीचे फोटोही समोर आलेत. ज्यात अधिपती अक्षराला उचलून घेत जेजुरीचा गड चढताना दिसत आहे. या मालिकेच्या शूटिंगसाठी हे कलाकार खरोखरच जेजुरीला गेले होते. तेथील खंडोबाच्या देवळातील एक फोटो शिवानीने शेअर केला. त्या फोटोमध्ये शिवानी पारंपारिक वेशभूषेत दिसत असून तिने कपाळावर भंडारा लावला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, ‘येळकोट येळकोट जय मल्हार!’ या एपिसोडचा आणखी एक प्रोमो समोर आलाय, ज्यात अक्षरा लोटांगण घालताना दिसली. एका सीनसाठी शिवानीने घेतलेल्या या मेहनतीचं विशेष कौतुक केलं जातंय. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’चा हा जेजुरी विशेष भाग बुधवार १७ ऑक्टोबर रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. अक्षराने नाईलाजाने अधिपतीशी लग्न केले असले तरी अधिपतीचे तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. आता या लग्नानंतर आणि जेजुरी स्पेशल एपिसोडनंतर अधिक्षराचं नातं काय वळण घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

COMMENTS