Homeताज्या बातम्यादेश

‘इंडिया आघाडी’त उभी फूट ?

ममता बॅनर्जींची ‘एकला चलो रे’ची भूमिका

नवी दिल्ली ः इंडिया आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यावर आले असतांना बुधवारी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता

4 मुलांना घेऊन आईची विहिरीत उडी
ST बस मध्ये सवलत हवीये ना, मग या तारखेपर्यंत काढा स्मार्ट कार्ड , पाहा काढण्याची सोपी पद्धत | LOK News 24
कांदा उत्पादकांना 550 कोटींची नुकसान भरपाई

नवी दिल्ली ः इंडिया आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यावर आले असतांना बुधवारी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली असून, आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा ममता यांनी बुधवारी केली आहे. इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का असून, भाजपचा मार्ग आणखी सुकर होतांना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी देखील स्वबळाचा नारा देत एकला चलो रेची भूमिका घेतली होती, त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी देखील एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
तृणमूल काँग्रेस पश्‍चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणुका लढणार असल्याचे ममता बॅनर्जींनी घोषित केले आहे. माझी काँग्रेस पक्षाशी कुठल्याही प्रकारे चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लोकसभा निवडणूक लढू, असे मी नेहमीच सांगितले होते. देशात काय होईल, याची काळजी मी करत नाही. पण, आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे. बंगालमध्ये आम्ही एकटे लढू आणि भाजपाचा पराभव करू, असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पश्‍चिम बंगालमधून जाणार आहे. यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी ‘इंडिया’ आघाडीची एक सदस्य आहे. राहुल गांधींनी न्याय यात्रा आमच्या राज्यातून जाणार आहे. पण, याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना देण्यात आली नाही. पश्‍चिम बंगालमध्ये काँग्रेसने तृणमूल काँग्रेससकडे 10 ते 12 जागांची मागणी केली होती. पण, तृणमूलने काँग्रेसला फक्त 2 जागा दिल्या होता. यानंतर पश्‍चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली होती. ममता बॅनर्जींच्या दयेवर निवडणुका लढवल्या जाणार नाहीत. ममता बॅनर्जी ज्या दोन जागा सोडण्यास तयार आहे, तिथे काँग्रेसने भाजप आणि तृणमूलचा पराभव केला आहे. निवडणूक कशी लढवायची, हे काँग्रेसला माहिती आहे, असा हल्लाबोल अधीर रंजन चौधरींनी ममता बॅनर्जींवर केला होता.

काँगे्रसने जागा-वाटपाचा प्रस्ताव फेटाळला – तृणमूल काँगे्रसच्या अध्यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी बुधवारी म्हणाल्या की, काँग्रेसने पश्‍चिम बंगालमधील जागावाटपाचा माझा प्रस्ताव नाकारला आहे. अशा स्थितीत आघाडी करण्यात अर्थ नाही. बंगालमध्ये आम्ही एकट्यानेच निवडणूक लढवू.काँग्रेस बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 10-12 जागांची मागणी करत आहे. तर टीएमसी फक्त दोन जागा देण्यावर ठाम आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या या जागा आहेत. अशा स्थितीत जागावाटपाचा प्रश्‍न गुंतागुंतीचा बनला आहे. ममता यांनी आधीच सांगितले आहे की जर टीएमसीला महत्त्व दिले गेले नाही, तर टीएमसी राज्यातील सर्व 42 लोकसभा जागांवर आपले उमेदवार उभे करेल आणि भाजपशी थेट लढत देईल.

पंजाबमध्ये ‘आप’चा स्वबळाचा नारा – ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीला ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्यानंतर आता  पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही लोकसभेच्या सर्व जागा लढणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडली का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. याबद्दल माध्यमांनी भगवंत मान यांना विचारल्यावर ते म्हणाले, पंजाबमध्ये आम्ही काँग्रेसबरोबर युती करणार नाही. राज्यातील 13 जागांवर आम्हाला यश मिळेल.

COMMENTS