Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडचिरोलीत धावत्या बसने पेट घेतला

नागपूर ः भंगार बसेसमुळे राज्यभरात चर्चेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारावर पुन्हा एकदा प्रश्‍न उपस्थित झाले आहे. शुक्रवारी सकाळ

नाशिक मनपा नोकरभरतीत स्थानिक रहिवासी असणे गरजेचे 
दुष्काळाच्या झळा आणि पाणीटंचाई
महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर !

नागपूर ः भंगार बसेसमुळे राज्यभरात चर्चेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारावर पुन्हा एकदा प्रश्‍न उपस्थित झाले आहे. शुक्रवारी सकाळी मुलचेरा-घोट मार्गावर धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. पण बस चालक व वाहकाने प्रसंगावधान दाखवत जंगलातच बस थांबवून प्रवाशांना तत्काळ खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी आगार भंगार बसेसमुळे कायम चर्चेत आहे.

COMMENTS