कडाक्याच्या थंडीत आ.बच्चु कडू यांचे कापडाच्या पालघरात राहून आंदोलन 

Homeताज्या बातम्या

कडाक्याच्या थंडीत आ.बच्चु कडू यांचे कापडाच्या पालघरात राहून आंदोलन 

नागपूर प्रतिनिधी - प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण व शहरी निकषात बदल करण्याच्या मागणीसाठी शिंदे फडणवीस सरकार मधील आमदार बच्चू कडू यांनी नागपुर पा

राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट
भोंदू अशोक खरातला मदत करणारे रडारवर; एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची माहिती
शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा मिळणार अंडी आणि केळी

नागपूर प्रतिनिधी – प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण व शहरी निकषात बदल करण्याच्या मागणीसाठी शिंदे फडणवीस सरकार मधील आमदार बच्चू कडू यांनी नागपुर पासून 30 किलोमीटर असलेल्या अंतरावर धामना येथे बेघरपाल ठोकून आंदोलन सुरू केलं आहे,या ठिकाणी बच्चू कडू यांनी जंगलात गाव वसवून बेघराचे गाव वसवलेल आहे तर यावेळी बच्चू कडू यांनी विविध आरोप केलेत,विधानसभा सभागृहात सुद्धा हा प्रश्न मांडला, लक्षवेधी केली, व्यक्तिगत पत्र देऊन सुद्धा दखल घेतली नाही,त्यामुळे हा आंदोलनाचा पवित्रा घेतला तर 29 तारखेला रक्तदान करून आंदोलन सुरूच ठेवू अशी माहिती देखील बचू कडू यांनी दिली.

COMMENTS